एक्स्प्लोर

महाजनादेश नव्हे तर 'महाआश्वासन यात्रा'

संपूर्ण दोऱ्यात तेच भाषण.. तेच मुद्दे.. फक्त स्थानिक नेते मंडळींच्या नावात बदल करून महाजनादेश यात्रा दोन दिवसात लातूर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून मार्गस्थ झाली.

लातूर : ते आले... त्यांनी पाहिले.. पुन्हा (भर दुष्काळात) आश्वासनाचा पाऊस पाडून ते गेले... लातूरच्या महाजनादेश यात्रेच्या दोन दिवसाचे हेच काय ते फलित, असे म्हणायची वेळ लातूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. कारणं देखील तशीच आहेत. या दोन दिवसाच्या यात्रेत स्थानिक प्रश्नांना बगल देत तेच ते मुद्दे पुन्हा जनतेच्या माथी मारण्यात आले. गेल्या 5 वर्षात जनतेचा आशीर्वाद घेऊन गेलेले मुख्यमंत्री आता तरी पदरी काय टाकतील? अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे निराशाच पडली आहे. लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस होते. महाजनादेश यात्रेच्या निमिताने ते आले होते. दोन दिवसात पाच सभा आणि काही गावांना भेटी देत ते निघूनही गेले. भर दुष्काळात गावा-गावात फुल- तुरे अन हार घेऊन ज्येष्ठांपासून विद्यार्थीही रांगेत उभे होते. मात्र, काही मिनिटांतच मुख्यमंत्र्यांचा ताफा यायचा आणि निघून जायचा. त्यामुळे हा जनादेश आहे कि त्यांचा आदेश हे न समजण्यापलीकडचे होते.असो एका दिवसात अहमदपूर, उदगीर, लातूर तर दुसऱ्या दिवशी निलंगा आणि औसा करत त्यांनी उस्मानाबाद गाठले. प्रत्येक ठिकाणी तेच मुद्दे, तेच भाषण. फरक इतकाच की मतदारसंघातील परस्थिती लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधीला खुश करणारी घोषणा त्यांनी केली. आगामी काळात विधानसभेच्या निवडणूका आहेत किमान यावेळी तरी स्थानिक मुद्द्यांना हात घालतील अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, राष्ट्रहिताचे मुद्दे सांगूनच हि निवडणूकही दामटून नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न सामान्य जनतेपासूनही लपून राहिला नाही. हटविण्यात आलेले 370 कलम, ग्रामसडक योजना, कर्जमाफी या लोकप्रिय घोषणांचा उल्लेख करण्यास मात्र त्यांना विसर पडला नाही. 31 ऑगस्ट अहमदपूर अहमदपूरकरांची रेल्वेची मागणी बरीच जुनी आहे. याबाबत आमदार विनायकराव पाटील यांनी मागणी केली तोच धागा पकडून राज्य सरकार पन्नास टक्के आणि केंद्र सरकार पन्नास टक्के गुंतवणूक करतील. लवकरच ही मागणी पूर्ण होईल यासाठी रेल्वे मंत्र्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र अहमदपूर आणि चाकूर एमआयडीसीच्या विकासाचा मुद्दा तसाच राहिला. 31 ऑगस्ट उदगीर हत्ती बेटास दहा कोटी रुपये निधी आणि शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा पाठपुरावा जो कि लोकसभा निवडणुकीदरम्यानही करण्यात आला होता. 31 ऑगस्ट लातूर लातूर शहराला उजनीचे पाणी देणार हे तीन वर्षांपूर्वीचे आश्वासन तसेच उद्योग धंदे वाढविणार आणि रेल्वे कोचच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार या घोषणांचा पाऊसही यात्रे दरम्यान झाला. जे जाहीर सभेत झाले तेच पत्रकार परिषदेत ही झाले. 1 सप्टेंबर निलंगा 463 कोटीचे अनुदान द्यावे, शिरुणतपळ ते गुलबर्गा रेल्वे जाळे उभा करावे यासंदर्भात पालकमंत्री संभाजी पाटील यांची मागणी अन मुख्यमंत्र्यांचे लगेच आश्वासन. 1 सप्टेंबर औसा माकणी धरणातून औसा शहराला 45 कोटी रुपयांची पाणीपुरवठ्याची योजना दहा दिवसात मंजूर करून देणार असल्याचे सांगण्यात आले. 1 सप्टेंबर उस्मानाबाद मेडिकल कॉलेज ची निर्मिती करू असे आश्वासन देण्यात आले. बाकी संपूर्ण दोऱ्यात तेच भाषण.. तेच मुद्दे.. फक्त स्थानिक नेते मंडळींच्या नावात बदल करून महाजनादेश यात्रा दोन दिवसात जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून मार्गस्थ झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे सरकार पीक विमा बाबत काहीतरी निर्णय घेईल, असे अपेक्षित होते. पाण्याचा प्रश्न शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गंभीर आहे त्यावर काय उपाययोजना करतील असे सर्व सामन्यात विचार होता मात्र फलित काय ते मात्र संशोधनाचा विषय राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget