एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session:  शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी; विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं?

Maharashtra Assembly Session:  विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Maharashtra Assembly Session:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काहीशा कमकुवत झालेल्या विरोधकांनी आज पहिल्या दिवशी आक्रमकता दाखवली. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली. तर, विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याविरोधातही ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 

विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही आमदार सहभागी झाले नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शरद पवार यांच्या गटातील आमदार काही कारणांनी उपस्थित झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आले आहे. या पत्राला आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील 14 दिवसांत उत्तर द्यायचे आहे. संविधानाच्या 10 शेड्युलमध्ये जी तरतूद आहेत त्यानुसार आम्ही नोटीस पाठवली असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले. उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव आहे. अध्यक्ष किंवा सभापती हे पदावर असताना जर अविश्वास असतो तेव्हा त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. नीलम गोऱ्हे यांनी खुर्चीवर बसू नये अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेत आम्ही जो अभुतपूर्व असा पेच प्रसंग निर्माण झाला आहें. त्यांच्यासमोर त्यांच्या अपात्रतेची आणि अविश्वास प्रस्ताव  चालू शकत नाही. त्याबद्दल पत्र दिले. त्यांच्या अपात्रतेची आम्ही नोटीस दिली आहे. अडव्होकेट जनरल याच्याकडून मत घेऊन कारवाई करावी. तोवर त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे अशी आमची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज्यातील पावसाची स्थिती गांभीर्याने पाहायची गरज असून, अद्याप 50 टक्के क्षेत्रात पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल झाला असून, अतिवृष्टी, गारपीट नुकसानीचे अनुदान अजूनही मिळाले नाही. त्यातच बियाणे, खते मोठ्या प्रमाणात बाजारात आलेत. तर सरकारी टोळी हफ्ते वसुली करतायेत, असा आरोप थोरात यांनी केला आहे. आज पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा व्हायला हवी होती बाळासाहेब थोरात यांनी दुबार पेरणी संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्यांवर त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ दिली नाही आणि विधानसभेचे कामकाज स्थगित झालं असल्याचे विरोधकांनी म्हटले. राज्यातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात सरकार हे गांभीर्याने पाहत नाही हे यावरून दिसून येत असल्याची टीका शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत बदल?

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्यात सत्तेत सहभागी झाली आहे. तर, दुसरीकडे  एक गट अजूनही विरोधी बाकांवर आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे. 

दरम्यान, आज विधानसभेत आणि विधान परिषदेत नवनिर्वाचित मंत्र्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर शोक प्रस्ताव मांडण्यात आला आणि दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget