एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session:  शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी; विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं?

Maharashtra Assembly Session:  विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Maharashtra Assembly Session:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काहीशा कमकुवत झालेल्या विरोधकांनी आज पहिल्या दिवशी आक्रमकता दाखवली. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली. तर, विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याविरोधातही ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 

विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही आमदार सहभागी झाले नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शरद पवार यांच्या गटातील आमदार काही कारणांनी उपस्थित झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आले आहे. या पत्राला आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील 14 दिवसांत उत्तर द्यायचे आहे. संविधानाच्या 10 शेड्युलमध्ये जी तरतूद आहेत त्यानुसार आम्ही नोटीस पाठवली असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले. उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव आहे. अध्यक्ष किंवा सभापती हे पदावर असताना जर अविश्वास असतो तेव्हा त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. नीलम गोऱ्हे यांनी खुर्चीवर बसू नये अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेत आम्ही जो अभुतपूर्व असा पेच प्रसंग निर्माण झाला आहें. त्यांच्यासमोर त्यांच्या अपात्रतेची आणि अविश्वास प्रस्ताव  चालू शकत नाही. त्याबद्दल पत्र दिले. त्यांच्या अपात्रतेची आम्ही नोटीस दिली आहे. अडव्होकेट जनरल याच्याकडून मत घेऊन कारवाई करावी. तोवर त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे अशी आमची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज्यातील पावसाची स्थिती गांभीर्याने पाहायची गरज असून, अद्याप 50 टक्के क्षेत्रात पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल झाला असून, अतिवृष्टी, गारपीट नुकसानीचे अनुदान अजूनही मिळाले नाही. त्यातच बियाणे, खते मोठ्या प्रमाणात बाजारात आलेत. तर सरकारी टोळी हफ्ते वसुली करतायेत, असा आरोप थोरात यांनी केला आहे. आज पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा व्हायला हवी होती बाळासाहेब थोरात यांनी दुबार पेरणी संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्यांवर त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ दिली नाही आणि विधानसभेचे कामकाज स्थगित झालं असल्याचे विरोधकांनी म्हटले. राज्यातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात सरकार हे गांभीर्याने पाहत नाही हे यावरून दिसून येत असल्याची टीका शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत बदल?

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्यात सत्तेत सहभागी झाली आहे. तर, दुसरीकडे  एक गट अजूनही विरोधी बाकांवर आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे. 

दरम्यान, आज विधानसभेत आणि विधान परिषदेत नवनिर्वाचित मंत्र्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर शोक प्रस्ताव मांडण्यात आला आणि दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Raj Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सगळयात आवडती कोणाची? शिंंदे की फडणवीस?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
SEBI : सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, 68 जणांची नोंदणी रद्द
सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, सेबीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 68 जणांची नोंदणी रद्द
Nitesh Rane on Cash: आमच्याकडे मोदी अन् फडणवीस आहेत, भाजपला निवडणुकीसाठी मनी पॉवरची गरज नाही: नितेश राणे
भाजप नेत्याच्या बेडरुममध्ये एवढी मोठी कॅश कुठून आली? नितेश राणेंनी स्पष्टच सांगितलं, 'आम्हाला पोटापाण्यासाठी...'
Embed widget