एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session:  शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी; विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं?

Maharashtra Assembly Session:  विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Maharashtra Assembly Session:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काहीशा कमकुवत झालेल्या विरोधकांनी आज पहिल्या दिवशी आक्रमकता दाखवली. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली. तर, विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याविरोधातही ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 

विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही आमदार सहभागी झाले नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शरद पवार यांच्या गटातील आमदार काही कारणांनी उपस्थित झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आले आहे. या पत्राला आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील 14 दिवसांत उत्तर द्यायचे आहे. संविधानाच्या 10 शेड्युलमध्ये जी तरतूद आहेत त्यानुसार आम्ही नोटीस पाठवली असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले. उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव आहे. अध्यक्ष किंवा सभापती हे पदावर असताना जर अविश्वास असतो तेव्हा त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. नीलम गोऱ्हे यांनी खुर्चीवर बसू नये अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेत आम्ही जो अभुतपूर्व असा पेच प्रसंग निर्माण झाला आहें. त्यांच्यासमोर त्यांच्या अपात्रतेची आणि अविश्वास प्रस्ताव  चालू शकत नाही. त्याबद्दल पत्र दिले. त्यांच्या अपात्रतेची आम्ही नोटीस दिली आहे. अडव्होकेट जनरल याच्याकडून मत घेऊन कारवाई करावी. तोवर त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे अशी आमची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज्यातील पावसाची स्थिती गांभीर्याने पाहायची गरज असून, अद्याप 50 टक्के क्षेत्रात पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल झाला असून, अतिवृष्टी, गारपीट नुकसानीचे अनुदान अजूनही मिळाले नाही. त्यातच बियाणे, खते मोठ्या प्रमाणात बाजारात आलेत. तर सरकारी टोळी हफ्ते वसुली करतायेत, असा आरोप थोरात यांनी केला आहे. आज पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा व्हायला हवी होती बाळासाहेब थोरात यांनी दुबार पेरणी संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्यांवर त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ दिली नाही आणि विधानसभेचे कामकाज स्थगित झालं असल्याचे विरोधकांनी म्हटले. राज्यातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात सरकार हे गांभीर्याने पाहत नाही हे यावरून दिसून येत असल्याची टीका शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत बदल?

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्यात सत्तेत सहभागी झाली आहे. तर, दुसरीकडे  एक गट अजूनही विरोधी बाकांवर आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे. 

दरम्यान, आज विधानसभेत आणि विधान परिषदेत नवनिर्वाचित मंत्र्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर शोक प्रस्ताव मांडण्यात आला आणि दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget