एक्स्प्लोर
किसान सभेचा नाशिक ते मुंबई विराट मोर्चा, हजारो शेतकरी सहभागी
सरकारने दिलेली कर्जमाफीही फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चाचे हत्यार उपसालं आहे.

नाशिक : किसान सभेच्या नेतृत्त्वात नाशिकहून मुंबईच्या दिशेने लॉंगमार्च निघालं आहे. नाशिकपासून सुरु झालेला हा मोर्चा 12 तारखेला विधिमंडळावर धडकणार आहे. हजारो शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चात सहभागी झाले आहेत.
सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार पाठीशी उभे राहत नसल्यान शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने दिलेली कर्जमाफीही फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चाचे हत्यार उपसालं आहे. मागण्या काय आहेत?
सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार पाठीशी उभे राहत नसल्यान शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने दिलेली कर्जमाफीही फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चाचे हत्यार उपसालं आहे. मागण्या काय आहेत? - कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात
- शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
- शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या
- स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा
- वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
- पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा
आणखी वाचा























