एक्स्प्लोर

लातूरमध्ये उद्यापासून पूर्णतः लॉकडाऊन! किराणा दुकानं आणि भाजीपाला मार्केटही बंद राहणार

लातूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे सर्वच स्तरातून लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी जोर धरत होती. लातूर शहराचा विचार केल्यास 100 कंटेन्मेंट झोन तयार झाले होते.

लातूर : लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी लातुरात प्रशासन सज्ज झालं आहे. अनेक नियम आणि अटींसह लॉकडाऊनची कडक अमंलबजावणी होणार आहे. किराणा दुकानं आणि भाजीपाला मार्केटसुद्धा या लॉकडाऊनदरम्यान बंद राहणार आहे. 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

लातूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे सर्वच स्तरातून लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी जोर धरत होती. लातूर शहराचा विचार केल्यास 100 कंटेन्मेंट झोन तयार झाले होते. तसेच ग्रामीण भागात ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले होते. जिल्ह्यात 720 पेक्षा जास्त कोरोना बधितांची संख्या गेली आहे. 33 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना याबाबत सतत विचारणा होत होती. मात्र प्रशासन अटी आणि नियमानुसार सर्व व्यवहार सुरळीत सुरु रहावेत यासाठी प्रयत्नशील होते. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ लागले. पुण्यात लॉकडाऊन सुरु झाले. यामुळे त्या भागातील लोक लातूर जिल्ह्यात आल्यास संसर्गचा धोका वाढू शकतो. हे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातसुद्धा लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे जाहीर करण्यात आलं आहे. यासंदर्भात माहिती सोमवारी देण्यात आली होती.

15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. याबाबत काय मार्गदर्शक सूचना आणि नियम असतील यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक लातुरात पार पडली. या बैठकीसाठी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी पालकमंत्री आणि निलगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर हे हजर होते. या बैठकीत लॉकडाऊनबाबत काही मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करण्यात आले आहेत.

काय आहेत मुख्य नियम :

  • दिनांक 15 ते 30 तारखेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
  • लातूर जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, ठोक आणि किरकोळ विक्री दुकाने 15 ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण बंद असणार आहेत. 21 ते 30 तारखेपर्यंत या ठिकाणावरून फक्त होम डिलिव्हरी करण्याची सूट असेल. ग्राहकांना दुकानात येता येणार नाही. यासाठीसुद्धा वेळेचे बंधन असणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतच होम डिलीवरी करता येणार आहे.
  • दवाखान्या जवळील मेडिकल दुकाने नेहमीप्रमाणे सुरु राहतील. इतर ठिकाणची मेडिकल दुकाने ठराविक वेळेत चालू राहतील.
  • झोमॅटो, स्वीगी आणि इतर हॉटेल मधील खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या सेवा 15 ते 30 तारखेपर्यंत संपूर्णतः बंद असणार आहेत
  • सार्वजनिक ठिकाणी, उद्याने बंद राहणार आहेत. तसेच सकाळ संध्याकाळ फिरायला जाण्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.
  • उपहारगृह, हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, मॉल बाजार हे संपूर्णता बंद असतील.
  • केशकर्तनालय, ब्युटी पार्लरही पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत.
  • मोंढा, कृषी उत्त्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट, आठवडी बाजार, दैनंदिन बाजार, फेरीवाले यांचे सर्व व्यवहार 15 ते 20 तारखेपर्यंत संपूर्णता बंद असणार आहेत. मात्र 21 ते 30 तारखेपर्यंत ठोक भाजी बाजार, फळ बाजार सुरु राहतील. 10 वाजेपर्यंतच भाजी फळे विक्री घरपोच करण्यात येणार आहे. स्टॉल लावून विक्री करता येणार नाही.
  • मास, मटण, अंडी, चिकन यांची दुकाने 15 ते 20 तारखेपर्यंत बंद असणार आहेत. 21 ते 30 तारखेपर्यंत सकाळी सात ते बारा यावेळेतच सुरु राहणार आहेत.
  • सार्वजनिक आणि खासगी दुचाकी तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी असेल. फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट असेल.
  • सर्व प्रकारची बांधकामे बंद असणार आहेत. बांधकामांवर निवासाची सोय असेल त्या ठिकाणी नियम पाळून बांधकाम करता येईल.
  • वर्तमानपत्रे छपाईची परवानगी आहे. वितरण मात्र सकाळी 6 ते 9 यावेळेतच करावे लागणार आहे.
  • शेतीसाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री पुरवठा करणारी दुकानं सकाळी सात ते बारा यावेळेत सुरु राहतील.
  • शेतकऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी पीक विमा बांधावर भरता येणार आहे. यासाठी कृषी विभागातील कर्मचारी मदत करणार आहेत.

वरील सर्व बाबींची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नियमाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
Palghar Rain: पुराच्या पाण्याने अखेरचा निरोपही रोखला, मृतदेहासह कुटुंबाला चार तास छतावर बसण्याची वेळ; पालघरमधील मन सुन्न करणारी घटना!
पुराच्या पाण्याने अखेरचा निरोपही रोखला, मृतदेहासह कुटुंबाला चार तास छतावर बसण्याची वेळ; पालघरमधील मन सुन्न करणारी घटना!
Chhatrapati Sambhajinagar : 90च्या दशकातील तथाकथित 'डॉन'च्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा; 'बाबा' डॉनच्या घरात 5 करोड रोख, सोन्या-चांदीसह मोठं घबाड सापडलं
90च्या दशकातील तथाकथित 'डॉन'च्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा; छत्रपती संभाजीनगरच्या 'बाबा' डॉनच्या घरात 5 करोड रोख, सोन्या-चांदीसह मोठं घबाड सापडलं
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Embed widget