एक्स्प्लोर

Konkan Refinery Project : राजापूरमध्ये रिफायनरीविरोधी पॅनल उभा करण्याचा निर्णय, शिवसेनेची डोकेदुखी वाढली!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता रिफायनरीविरोधी पॅनलरिफायनरीचे समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाहीगाव आणि मुंबईच्या नागरिकांच्या सभेत निर्णय

रत्नागिरी : कोकणात रिफायनरीच्या मुद्यावरुन आता राजकीय पडसाद उमटत आहेत. कारण, रिफायनरीची चर्चा सुरु असलेल्या राजापूर तालुक्यातील पंचक्रोशीमध्ये थेट रिफायनरीविरोधी पॅनल उभे केले जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशाप्रकारे उतरण्याचा निर्णय मुंबई इथे रविवारी (17 एप्रिल) झालेल्या सभेत घेण्यात आला. मुख्य बाब म्हणजे रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना गावात प्रवेश देखील न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. शिवाय, रिफायनरी विरोध आता तालुक्यात देखील नेण्याबाबतचा निर्णय झाला आहे. 

मुंबई आणि गावचे मिळून जवळपास 200 च्या संख्येने नागरिक या सभेत सहभागी झाले होती. मुख्य बाब म्हणजे धोपेश्वर गावाच्या ग्रामपंचायतीत रिफायनरीविरोधात झालेल्या ठरावानंतरची ही एक मोठी घडामोड आहे. याच भागात शिवसेनेचं राजकीय प्राबल्य असून बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी यापूर्वी शिवसेनेने शिवसंपर्क अभियान न राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता थेट रिफायनरी विरोधकांनी राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रिफायनरीच्या मुद्यावरुन कोकणात शिवसेनेची डोकेदु:खी मात्र वाढली आहे.

मुंबईतील सांताक्रूझ इथे पार पडलेल्या या बैठकीत पंचक्रोशीतील ग्रामीण आणि मुंबई समितीचे पदाधिकारी, सदस्य, गावकर, गावप्रमुख, वाडीप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे...

1. रिफायनरी विरोधी पॅनलची अधिकृत घोषणा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लढवून जिंकणारच

2. वाडी-वाडीत रिफायनरीविरोधी पॅनलचे बोर्ड लावणार

3. परिसरातील गावांचे संपर्क अभियान

4. महिला संघटन करणे आणि मे महिन्यात मोठा महिला मेळावा
 
5. सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचे लिखित राजीनामे

6. सर्वच राजकीय पक्षांचे रिफायनरी समर्थक पदाधिकारी, आमदार, खासदार यांना रिफायनरी रद्द होईपर्यंत गावात प्रवेश नाही
 
7. आतापर्यंत मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, राज्यपाल आदींना भेटीसाठी दिलेल्या पत्राबद्दल फॉलोअप

राजापूरमध्ये प्रकल्प प्रस्तावित
राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानुसार, रिफायनरीसाठी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या

Kokan Refinery Project :  एकच जिद्द, रिफायनरी रद्द! राजापूरमध्ये प्रस्तावित प्रकल्पाविरोधात मोर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget