एक्स्प्लोर

कोकणातून बाहेर जाण्या-येण्यासाठी हजारो अर्ज; रत्नागिरीतून एसटीद्वारे लोकांना घरी पोहोचवण्याची प्रक्रिया सुरु

राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी आता एसटीची मदत घेतली जात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यामधून या एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी :लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक जण अडकून पडले आहेत. प्रत्येकाकडून आपल्या घरी, गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरता जिल्हा प्रशासनाकडून देखील सहकार्य केले जात आहे. नागरिकांना ऑनलाईन पास देत त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले जात आहे. यामध्ये लालपरी अर्थात एसटी देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कारण राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी आता एसटीची मदत घेतली जात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यामधून या एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. आज रत्नागिरीतून देखील सिंधुदुर्ग आणि ओरोसकरता दोन एसटी बसेस सोडण्यात आल्या. यामधून 39 प्रवाशांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना यावेळी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. शिवाय, सोशल डिस्टन्सिंग राखत रत्नागिरी जिल्ह्यात अडकलेल्यांना त्यांच्यामुळ गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील विविध एसटी आगारातून या एसटी बसेस सोडण्यात आल्या. दरम्यान, जिल्ह्यातून 25 एसटी बसेस या रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावतीकरता सोडण्यात येणार आहेत. शुक्रवारी ( 8 मे ) रत्नागिरी जिल्ह्यातून सहा एसटी बसेस सोडण्यात आल्या. चिपळूण , लांजा, रत्नागिरी आणि दापोलीमधून या एसटी बसेस सिंधुदुर्ग आणि रायगडकरता सोडण्यात आल्या. तर, आज ( 9 मे ) 16 एसटी बसेस या सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, बुलढाणा आणि साताराकरता सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी, देवरूख, दापोली, चिपळूण, गुहागर, मंडणगड या आगारातून या एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच उद्या अर्थात 10 मे रोजी देखील गोंदिया आणि अमरावती करता तीन एसटी बसेस या खेड, मंडणगड आणि चिपळूण या एसटी आगारातून सुटणार आहेत. ऑनलाईन अर्जांच्या संख्येत वाढ जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी जाता यावे. शिवाय, जिल्ह्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी येण्याकरता जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या अर्जांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्याबाहेर जाण्याकरता 28,880 तर येण्याकरता 30,814 अर्ज करण्यात आले आहेत. मजुरांची संख्या देखील मोठी रत्नागिरी जिल्ह्यात देखील सध्या परराज्यातील हजारो मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्याकडून देखील आपल्या गावी जाण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये देखील त्यांची संख्या ही मोठी आहे. सध्या काम नसल्याने त्यांचे देखील हाल होत असल्याचे चित्र आहे. आमच्याकडे काम नाही, पैसे नाहीत त्यामुळे आता आम्ही करायचे तरी काय? आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, अशी प्रतिक्रिया सध्या मजुरांकडून येत आहेत. अनेक मजूर तर पायी आपला गाव जवळ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर काही जण छुप्या पद्धतीने गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
Embed widget