एक्स्प्लोर

Kargil Vijay Diwas | अंगावर 15 गोळ्या लागूनही शत्रूशी लढलेले परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांची शौर्यगाथा

कारगिल युद्धात योगेंद्र यांच्या अंगावर 15 हून अधिक गोळ्या लागल्या होत्या. मात्र जीवाची पर्वा न करत त्यांनी शत्रूवर चढाई केली. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका निभावलेले योगेंद्र सिंह यादव देशातील 21 परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान झालेल्यांपैकी एक आहेत. योगेंद्र सध्या 18 ग्रेनेडियर्समध्ये सुभेदार पदावर बरेली येथे कार्यरत आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसासाठी त्यांचा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मृत्यूची पर्वा न करता 15 गोळ्या अंगावर लागल्या असतानाही योगेंद्र यांनी शत्रूचा मोठ्या हिमतीने सामना केला आणि टायगर हिल्सवरुन पाकिस्तानी सैन्याला परत फिरण्यास भाग पाडलं.

योगेंद्र उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील औरंगाबाद अहीर गावचे रहिवाशी आहेत. योगेंद्र यांचे वडील रामकरन यादव हे देखील लष्करात होते. 1965 आणि 1971 च्या युद्धात ते सहभागी होते. पुढे युद्धातील शौर्यगाथा ते आपल्या मुलांना सांगत असत.

वडिलांकडून प्रेरणा घेत योगेंद्र हे अवघ्या 17 व्या वर्षी सैन्यात सामील झाले. 27 डिसेंबर 1997 रोजी त्यांनी सैन्यात नोकरी सुरु केली. त्यानंतर मे 1999 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि लग्नाच्या पंधराव्या दिवशीच म्हणजे 20 मे 1999 रोजी त्यांना बॉर्डरवर जाण्याचे आदेश मिळाले. तोपर्यंत कारगिल युद्ध सुरु झालं होतं. बॉर्डरवर परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र हेच कारगिल युद्ध योगेंद्र यांना नवी ओळख देणार होतं. 22 जून 1999 मध्ये योगेंद्र यांना तोलोलिंग शिखरावर तैनात करण्यात आलं.

22 दिवस याठिकाणी युद्ध सुरु होतं. त्यानंतर त्यांना 12 जुलै रोजी टायगर हिल्सवर जाण्याचे आदेश देण्यात आले. रक्त गोठवणाऱ्या थंड वातावरणात शत्रूला तोंड देताना दुहेरी संकट भारतीय जवानांसमोर होतं. भारतीय जवान रात्रीच्या वेळी टायगर हिल्सवर चढत असत, जेणेकरुन समोर-समोर लढाई व्हावी. उंचीवर असल्याचा पाकिस्तानी घुसखोरांना फायदा मिळत होता.

योगेंद्र यांच्या सोबतचे अनेक जवान शत्रूचा सामना करताना शहीद झाले, मात्र योगेंद्र यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. योगेंद्र यांचा एक हात यादरम्यान मोडला होता, मात्र त्यांनी हार मानली नाही. ग्रेनेड संपल्यानंतर त्यांनी बंदूक हातात घेतली आणि अनेक घुसखोरांचा खात्मा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्यांनी टायगर हिल्सवर तिरंगा फडकवला. टायगर हिल्सवर कब्जा केल्यानंतर काही वेळातच योगेंद्र बेशुद्ध पडले.

डॉक्टरांनी योगेंद्र यांची तपासणी केली तेव्हा त्यांना 15 हून अधिक गोळ्या लागल्याचं निष्पन्न झालं. मात्र तरीही ते जिवंत होते याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली. योगेंद्र यांनी केलेल्या या साहसी पराक्रमाबद्दल त्यांना वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं. योगेंद्र यांच्यासारखे हजारो जवान कारगिल युद्धात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी लढले.

8 मे ते 26 जुलै दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले, तर 1363 जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

VIDEO | गोष्ट कारगिल युद्धात पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या नचिकेताची | स्पेशल रिपोर्ट 

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget