एक्स्प्लोर

Kargil Vijay Diwas | अंगावर 15 गोळ्या लागूनही शत्रूशी लढलेले परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांची शौर्यगाथा

कारगिल युद्धात योगेंद्र यांच्या अंगावर 15 हून अधिक गोळ्या लागल्या होत्या. मात्र जीवाची पर्वा न करत त्यांनी शत्रूवर चढाई केली. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका निभावलेले योगेंद्र सिंह यादव देशातील 21 परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान झालेल्यांपैकी एक आहेत. योगेंद्र सध्या 18 ग्रेनेडियर्समध्ये सुभेदार पदावर बरेली येथे कार्यरत आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसासाठी त्यांचा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मृत्यूची पर्वा न करता 15 गोळ्या अंगावर लागल्या असतानाही योगेंद्र यांनी शत्रूचा मोठ्या हिमतीने सामना केला आणि टायगर हिल्सवरुन पाकिस्तानी सैन्याला परत फिरण्यास भाग पाडलं.

योगेंद्र उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील औरंगाबाद अहीर गावचे रहिवाशी आहेत. योगेंद्र यांचे वडील रामकरन यादव हे देखील लष्करात होते. 1965 आणि 1971 च्या युद्धात ते सहभागी होते. पुढे युद्धातील शौर्यगाथा ते आपल्या मुलांना सांगत असत.

वडिलांकडून प्रेरणा घेत योगेंद्र हे अवघ्या 17 व्या वर्षी सैन्यात सामील झाले. 27 डिसेंबर 1997 रोजी त्यांनी सैन्यात नोकरी सुरु केली. त्यानंतर मे 1999 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि लग्नाच्या पंधराव्या दिवशीच म्हणजे 20 मे 1999 रोजी त्यांना बॉर्डरवर जाण्याचे आदेश मिळाले. तोपर्यंत कारगिल युद्ध सुरु झालं होतं. बॉर्डरवर परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र हेच कारगिल युद्ध योगेंद्र यांना नवी ओळख देणार होतं. 22 जून 1999 मध्ये योगेंद्र यांना तोलोलिंग शिखरावर तैनात करण्यात आलं.

22 दिवस याठिकाणी युद्ध सुरु होतं. त्यानंतर त्यांना 12 जुलै रोजी टायगर हिल्सवर जाण्याचे आदेश देण्यात आले. रक्त गोठवणाऱ्या थंड वातावरणात शत्रूला तोंड देताना दुहेरी संकट भारतीय जवानांसमोर होतं. भारतीय जवान रात्रीच्या वेळी टायगर हिल्सवर चढत असत, जेणेकरुन समोर-समोर लढाई व्हावी. उंचीवर असल्याचा पाकिस्तानी घुसखोरांना फायदा मिळत होता.

योगेंद्र यांच्या सोबतचे अनेक जवान शत्रूचा सामना करताना शहीद झाले, मात्र योगेंद्र यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. योगेंद्र यांचा एक हात यादरम्यान मोडला होता, मात्र त्यांनी हार मानली नाही. ग्रेनेड संपल्यानंतर त्यांनी बंदूक हातात घेतली आणि अनेक घुसखोरांचा खात्मा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्यांनी टायगर हिल्सवर तिरंगा फडकवला. टायगर हिल्सवर कब्जा केल्यानंतर काही वेळातच योगेंद्र बेशुद्ध पडले.

डॉक्टरांनी योगेंद्र यांची तपासणी केली तेव्हा त्यांना 15 हून अधिक गोळ्या लागल्याचं निष्पन्न झालं. मात्र तरीही ते जिवंत होते याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली. योगेंद्र यांनी केलेल्या या साहसी पराक्रमाबद्दल त्यांना वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं. योगेंद्र यांच्यासारखे हजारो जवान कारगिल युद्धात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी लढले.

8 मे ते 26 जुलै दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले, तर 1363 जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

VIDEO | गोष्ट कारगिल युद्धात पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या नचिकेताची | स्पेशल रिपोर्ट 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget