एक्स्प्लोर

Satej Patil on Tata Airbus Project : गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का? मुंबईचे महत्त्व कमी करणे हाच भाजपचा अजेंडा, सतेज पाटलांचा हल्लाबोल 

Satej Patil on Tata Airbus Project : राज्याच्या वाट्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रणंकदन सुरु झाले आहे. तीन महिन्यात तीन प्रकल्प गेल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांनी चौफेर टीका केली आहे.

Satej Patil on Tata Airbus Project : राज्याच्या वाट्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रणंकदन सुरु झाले आहे. तीन महिन्यात तीन प्रकल्प गेल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांनी चौफेर टीका केली आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का? अशी शंका येत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. राज्याला मागं ढकलण्याचा प्राधान्यक्रम या सरकारचा असल्याचा घणाघात त्यांनी केला. मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचा आरोप त्यांनी केला. 

नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन कमी पडतं हे आता लोकांना कळलं आहे. देशाचं सरकार एका राज्यासाठी चाललय का असा प्रश्न निर्माण होत आहे. डायमंड इंडस्ट्री, बुलियन ट्रेडिंग असे अशा महत्त्वाच्या केंद्र गुजरातला गेली, त्यामुळे गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का अशी शंका आहे.

देशाची सगळी संपत्ती एका राज्यात घेऊन जाण राज्यावर अन्यायकारक आहे, एअरलाईन्सचे प्रमुख ऑफिस मुंबईहून नोएडाला गेले, मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचे ते म्हणाले. 

तर थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असतं

यावेळी सतेज कोल्हापूर शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या थेट पाईपलाईन योजनेबाबत माहिती दिली. पाऊस लांबला नसता तर थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असतं असे त्यांनी सांगितले. राहिलेलं कामही पूर्ण करू, सरकार म्हणून ते मदत करणार असतील तर काही अडचण नाही, पण आता फार मदत लागेल अशी परिस्थिती नाही. काम थांबल्यास मी सुद्धा त्यांना सांगेन, असेही ते यावेळी म्हणाले. 

शहराची खड्ड्यांमुळे विदारक अवस्था झाली आहे. महापालिकेतील अभियंत्याची आईचाही खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी नसणे हे शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांनी महापालिका निवडणुका न झाल्याचा परिणाम विकासकामांवर दिसत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने देखील यासाठी अजून निधी द्यावा. 

इतर महत्वाच्या बातम्याच्या 

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget