एक्स्प्लोर

IPL 2022: 25 टक्के नव्हे तर 'इतक्या' प्रेक्षकांना स्डेडियममध्ये परवानगी द्यावी, आशिष शेलारांची विधानसभेत मोठी मागणी

Ashish Shelar on IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले असताना आशिष शेलार यांनी आयपीएलसंदर्भात विधानसभेत मोठा मुद्दा उपस्थित केलाय.

Ashish Shelar on IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले असताना आशिष शेलार यांनी आयपीएलसंदर्भात विधानसभेत मोठा मुद्दा उपस्थित केलाय. या हंगामातील सर्व सामने महाराष्ट्राच्या वानखेडे, ब्रेबॉन, डि.वाय पाटील या स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. हे सामने पाहण्यासाठी शासनानं 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रेवश देण्याची परवानगी दिलीय. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध दर्शवण्यात आलाय. आशिष शेलार यांनी 25 टक्क्यांएवजी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी केलीय. 

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनं 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रेवश देण्याचा निर्णय घेतलाय. परंतु,  स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यअल्प जागा उपलब्ध होतील. त्यामुळं एमसीएच्या वतीनं याबबात क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असून शासनानं 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. तसेच मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान या मैदानावर नवे खेळाडू तयार होतात. पण या मैदानांचील खेळपट्टयांची लिज संपली असून शासनानं लिजचं तातडीनं नुतनिकरण करावं अशी मागणी त्यांनी केली. 

यंदाचा हंगामही प्रेक्षकांविना होण्याची शक्यता
दरम्यान, चीन, दक्षिण कोरियासह युरोपियन देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रालाही सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र सरकारनं याआधी 25 टक्के प्रेक्षकांसह आयपीएलच्या सामने खेळण्यास परवानगी दिली. पण येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास राज्य सरकारकडून परवानगी रद्द केली जाऊ शकते. यामुळं आयपीएलचा पुढचा हंगामाही प्रेक्षकांविना खेळला जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यंदा आयपीएलमधील सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत.

आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच!
आयपीएलच्या आगामी पंधराव्या मोसमासाठी बीसीसीआय सज्ज झालंय. येत्या 26 मार्च ते 29 मे या कालावधीत आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या मोसमातल्या 74 पैकी 70 साखळी सामन्यांचं आयोजन मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमापासून आठऐवजी दहा संघ खेळणार आहेत. या दहा संघांची 'अ' आणि 'ब' अशा गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातल्या संघांसोबत एकेक सामना आणि दुसऱ्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. त्यामुळं संघांची संख्या वाढली असली तरी सामन्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसून येत आहे.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime : भाजप आमदाराच्या भावाला अपघाताचा बनाव रचत संपवण्याचा कट, बच्चू कडूंवर गंभीर आरोप; अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये गुन्हा दाखल
भाजप आमदाराच्या भावाला अपघाताचा बनाव रचत संपवण्याचा कट, बच्चू कडूंवर गंभीर आरोप; अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये गुन्हा दाखल
Anjali Damania On Ashok Kharat Case: रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!
रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ

व्हिडीओ

Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
Gold Silver Rates:युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
इराणला 'अश्मयुगा'त नेण्यापूर्वी ट्रम्पनी युद्ध सुरु असतानाच अमेरिकन लष्करप्रमुखांसह तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरी पाठवलं; नेमकं असं काय घडलं?
इराणला 'अश्मयुगा'त नेण्यापूर्वी ट्रम्पनी युद्ध सुरु असतानाच अमेरिकन लष्करप्रमुखांसह तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरी पाठवलं; नेमकं असं काय घडलं?
Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
Ashok Kharat Case Nashik Crime News: Silent मोड, काही प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांनी सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Silent मोड, प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांनी सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Embed widget