एक्स्प्लोर

Indrayani River Bridge Collapses  :  वृद्धाचा जगण्यासाठी संघर्ष! चेहरा बाहेर शरीर मात्र पुलाच्या सांगाड्याखाली

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Indrayani River Bridge Collapses :  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे.  यामध्ये 20 ते 25 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण झखमी झाले आहेत. यामध्ये 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अनेक जण नदीत वाहून गेले आहेत. तर काही जण कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्याखाली अडकले आहेत. एका वृद्धाचा चेहरा नदीच्या पाण्याबाहेर दिसला. तर बाकीचं शरीर हे पुलाच्या सांगाड्याखाली अडकल्याचं बघायला मिळालं. दरम्यान सध्या बचावकार्य सुरु आहे.

अहमदाबादमधील विमान अपघातात 270 जण दगावल्याची बातमी ताजी असताना आज केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघाताची घटना समोर आल्यानंतर लगेच आज दुपारी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोखंडी पूल कोसळल्याची घटना समोर येत आहे. या घटनेमुळेदेखील मोठी खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे आज रविवार असल्याने हजारो पर्यटक आले होते. यावेळी इंद्रायणी नदीवर उभा असलेला लोखंडी पूल कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे 20 ते 25 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती आहे. तर काही जण तुटलेल्या पुलाच्या सांगाड्याखाली अडकले आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळाली आहे. 

कटरच्या सहाय्याने कापले लोखंडी पुलाचे भाग,  वृद्धाला बाहेर काढण्यात यश 

दरम्यान, पूल कोसळल्यानंतर अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. तर काहीजण पुलाच्या सांगाड्याखाली अडकले आहेत. याचवेळी एक वृद्ध देखील पाण्याखाली अडकला होता. या वृद्धाचे तोंड पाण्याबाहेर होतं. तर बाकीचं शरीर हे पुलाच्या सांगाड्याखाली अडकलं होतं. गेल्या तीन तासांपासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. पण बचाव पथकाला यश मिळताना दिसत नव्हतं. अखेर एनडीआरएफच्या पथकाला कटरच्या सहाय्याने लोखंडी पुलाचे भाग कापावे लागले. त्यानंतर पथकाला वृद्धाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. 

नेमकी कशी घडली घटना? 

पूल कोसळल्याची घटना नेमकी कशी घडली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, आमचा 25 ते 30 जणांचा समूह पुलावर होता. एकाच ठिकाणी काही वेळ आम्ही सर्वजण थांबलो होतो. आम्ही पुलावर असतानाच काही कळायच्या आतच पूल कोसळल्याने बरेच जण खाली पडले. त्यातील काही लोक लगेच नदीच्या काठावर आले. परंतु काही लोक पाण्यात पडून बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. वाहून गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील पूल अतिशय जीर्ण झालेला होता. त्याच पुलावर पर्यटक समूहाने फोटो काढत होते. नदीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा प्रयत्न पर्यटकांचा होता. मात्र पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल कोसळल्याची घटना घडल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर तातडीने प्रशासनाने बचावकार्य सुरु केले आहे. काही जणांना बाहेर काढण्यात यश देखील आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget