एक्स्प्लोर

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारच : डॉ. अशोक दलवाई

2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यार असून देशात २२ हजार गावात ग्रामीण कृषी मार्केटच जाळ उभारणार असल्याची माहिती केंद्राच्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी दिली आहे.

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय पंतप्रधान मोदींनी केला असून देशाची पावलं त्याच दिशेने सुरु आहेत. देशभरातील 22 हजार गावात आता ग्रामीण कृषी मार्केटचं जाळ उभं करून 2022 पर्यंत भारत 33 बिलियन हुन 66 बिलियन एव्हढा कृषी माल एक्स्पोर्ट करणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी नेमल्येल्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी दिली आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या 22व्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. ज्याचे उदघाटन केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे अभ्‍यास समितीचे अध्‍यक्ष डॉ अशोक दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत देशातील कृषी धोरण स्पष्ट केले. 2022 ला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. शिवाय महात्मा गांधींची 150वी जयंतीही असल्याने 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असून एक मास्टर प्लानही त्यासाठी आखण्यात येत आहे. ज्यात यापुढे देशातील शेतकऱ्यांना केवळ बाजार समित्यांवर अवलंबून रहाव लागणार आहे. गावातील माल गावातच विकत घेतला जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर 22 हजार गावात ग्रामीण कृषी मार्केटही सुरू केले जाणार असल्याचे डॉ. अशोक दलवाई यांनी सांगितले. डॉ. अशोक दलवाई पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण कृषी मार्केट त्यावर बाजार समिती आणि खाजगी बाजार समित्या या दोन्हीच्या वरती थेट एक्स्पोर्ट मार्केट केले जाणार आहे. ज्याच्या माध्यमातून आपला याच साली 33 हजार 33 बिलियन अमेरिकन डॉलरहून 66 बिलियन अमेरिकन डॉलर एवढा कृषी माल एक्स्पोर्ट करण्याचा संकल्प आहे. ज्याने शेतकऱ्यांच्या मालाला भावही मिळेल आणि त्यांचे उत्पन्नदेखील दुप्पट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी सरकार सुभाष पाळेकर यांची पद्धत सुद्धा वापरणार असल्याचे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Parbhani : जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजप धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
Pune BJP : पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
Embed widget