एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे यांना भेटलो, भविष्यात युती शक्य : प्रकाश आंबेडकर

सध्या काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकरांची आघाडीची चर्चा पुढे जात नसल्याने त्यांनी शिवसेनेकडे मैत्रीसाठी हात पुढे केला आहे. आपण शिवसेनेबाबत सकारात्मक असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज युतीसाठी थेट शिवसेनेला साद घातली आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भविष्यात आपण शिवसेनेशी युती होऊ शकते. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकदा भेटलोही होतो. मात्र ही चर्चा पुढे गेली नसल्याचं आंबेडकर म्हणाले. आपण शिवसेनेबाबत सकारात्मक आहोत. मात्र, आपल्यासोबत कुणीच लग्न करायला तयार नाही, फक्त फिरवायला तयार असल्याची खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली. आता प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीच्या प्रस्तावाला शिवसेना काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

आंबेडकरांच्या यातून भविष्यात नव्या समिकरणाची चाचपणी सुरु केल्याचं बोललं जात आहे. सध्या काँग्रेससोबतची आंबेडकरांची आघाडीची चर्चा पुढे जात नसल्याने आंबेडकरांनी मैत्रीसाठी सेनेला चुचकारल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आंबेडकरांनी यातून शिवसेनेला राज्यात नव्या 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या समिकरणासाठी साद घातली काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

'विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करा'
मुंबईतील शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त निशित मिश्रा यांनी या हल्ल्याच्या शक्यतेसंदर्भात सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांना एक पत्र लिहिलं होतंय. या पत्राचं काय झालंय असा सवाल आंबेडकरांनी विचारला आहे. तसंच या हल्ल्याची चौकशी नांगरे पाटलांकडून काढून घेण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे. 

राज ठाकरेंवर कठोर कारवाईची मागणी
राज ठाकरेंनी काल (12 एप्रिल) ठाण्यात केलेल्या मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या भडकाऊ भाषणावर आंबेडकरांनी टीका केली आहे. हनुमान चालीसा ज्याला म्हणायची, गायची आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, राज ठाकरेंनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठणाची भूमिका दंगल घडवण्याची असल्याचं आंबेडकर म्हणाले. गृहमंत्र्यांनी वेळ न दडवता राज ठाकरेवर कारवाई करावी. मात्र, राज्य सरकार यासाठी जाणीवपूर्वक कारवाईसाठी वेळ लावत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.  

वीजप्रश्न सोडवता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा
राज्यावरचं वीज संकट हे सरकारचं अपयश असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा देत नव्या सरकारकडे प्रश्न सोपवावा, असा टोला आंबेडकरांनी लगावला. मंत्र्यांचे बंगले वाढत असतांना महावितरणचे खिसे खाली कसे होतात?, असा प्रश्न विचारत आंबेडकरांनी भारनियमनाच्या मुद्द्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊंतांना टोला लगावला आहे.

'एसटी कर्मचाऱ्यांनी विनाअट कामावरु रुजू व्हाव'
एसटी कामगारांनी विनाअट आता कामावर रुजू व्हावं. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन होऊ शकत नाही. मात्र, बाकी मागण्यासंदर्भात आम्ही एसटी कामगारांसोबत असल्याचं आंबेडकर म्हणाले. या संदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी एसटीचं आंदोलन भरकटवल्याचं आंबेडकर म्हणाले. 

शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुजात आंबेडकर इंग्लंडला जाणार
सुजात आंबेडकर आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लवकरच इंग्लंडमध्ये जाणार आहेत. तूर्तास त्यांचं लक्ष अभ्यासाकडे असून ते राजकारणत येण्याबाबतचा निर्णय भविष्यात होईल. सुजात यांच्या अलिकडच्या राजकीय भूमिकासंदर्भात त्यांनी आपल्याशी कधीच चर्चा केली नसल्याचं आंबेडकर म्हणाले. 

उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकी पैशांचा वारेमाप वापर
दरम्यान, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर झाल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकर यांनी केला आहे. एका मतासाठी 3 ते 8 हजारांची बोली लागल्याचं ते म्हणाले. जास्त पैसे खर्च करणारा उमेदवारच निवडून येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget