एक्स्प्लोर

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात आभाळ फाटलं, मुसळधार पावसामुळं पिकं मातीमोल, शेतकरी संकटात

नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज सकळपासून मुसळधार पाऊस  (Rain)सुरु झाला आहे. या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत.

Nanded Rain : नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज सकळपासून मुसळधार पाऊस  (Rain)सुरु झाला आहे. दिवाळीच्या आनंदी वातावरणात शेतकऱ्यांसमोर या पावसामुळं संकट उभं राहिलं आहे.  आभाळ फाटल्याची स्थिती नांदेड जिल्ह्यात झाली आहे. या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत. गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. काही ठिकाणी पिकांची काढणी सुरु आहे, अशातच पाऊस सुरु असल्यानं शेती कामांचा देखील खोळंबा झाला आहे.

गेल्या 15 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.या सततच्या पावसामुळं काढणीस आलेली सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिकं मतीमोल झाली आहेत. त्यामुळं ऐन दिवाळीत सुरु असलेल्या या सततच्या पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या दिवाळी सणवार विरजण पडलंय.

या तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळं पिकं मातीमोल होण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या दोन आठवड्यापासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु आहे. आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, भोकर, देगलूर, बिलोली या तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकात अक्षरशः पाणीच पाणी झालं आहे. त्यामुळं हातची आणि काढणीस आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. एकीकडं दिवाळी सणाचा उत्साह, आनंद सुरु असताना शेतकरी मात्र संकटात आहे. अद्याप काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप मदतही मिळाली नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, दुसरीकडं शेतकरी सोयाबीन पाण्यातून काढताना दिसत आहेत. बऱ्यापैकी सोयाबीनचे पिक वाया गेलं आहे. सध्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर, फाटके कपडे आणि डोळ्यात अश्रू आहेत.

सततच्या नुकसानीमुळं शेतकरी उचलतायेत टोकाचं पाऊल

पावसामुळं होणाऱ्या नुकसानीमुळं शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात एक, बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. पिकांचे होणार नुकसन आणि वाढत जाणारा कर्जबाजारीपणा यामुळं शेतकरी सतत चिंतेत आहेत. यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.

15 दिवसात मदत करण्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन

गेल्या तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Abdul Sattar: कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget