एक्स्प्लोर

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात आभाळ फाटलं, मुसळधार पावसामुळं पिकं मातीमोल, शेतकरी संकटात

नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज सकळपासून मुसळधार पाऊस  (Rain)सुरु झाला आहे. या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत.

Nanded Rain : नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज सकळपासून मुसळधार पाऊस  (Rain)सुरु झाला आहे. दिवाळीच्या आनंदी वातावरणात शेतकऱ्यांसमोर या पावसामुळं संकट उभं राहिलं आहे.  आभाळ फाटल्याची स्थिती नांदेड जिल्ह्यात झाली आहे. या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत. गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. काही ठिकाणी पिकांची काढणी सुरु आहे, अशातच पाऊस सुरु असल्यानं शेती कामांचा देखील खोळंबा झाला आहे.

गेल्या 15 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.या सततच्या पावसामुळं काढणीस आलेली सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिकं मतीमोल झाली आहेत. त्यामुळं ऐन दिवाळीत सुरु असलेल्या या सततच्या पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या दिवाळी सणवार विरजण पडलंय.

या तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळं पिकं मातीमोल होण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या दोन आठवड्यापासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु आहे. आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, भोकर, देगलूर, बिलोली या तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकात अक्षरशः पाणीच पाणी झालं आहे. त्यामुळं हातची आणि काढणीस आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. एकीकडं दिवाळी सणाचा उत्साह, आनंद सुरु असताना शेतकरी मात्र संकटात आहे. अद्याप काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप मदतही मिळाली नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, दुसरीकडं शेतकरी सोयाबीन पाण्यातून काढताना दिसत आहेत. बऱ्यापैकी सोयाबीनचे पिक वाया गेलं आहे. सध्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर, फाटके कपडे आणि डोळ्यात अश्रू आहेत.

सततच्या नुकसानीमुळं शेतकरी उचलतायेत टोकाचं पाऊल

पावसामुळं होणाऱ्या नुकसानीमुळं शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात एक, बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. पिकांचे होणार नुकसन आणि वाढत जाणारा कर्जबाजारीपणा यामुळं शेतकरी सतत चिंतेत आहेत. यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.

15 दिवसात मदत करण्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन

गेल्या तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Abdul Sattar: कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Pune News: देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Navneet Rana Sunetra Pawar: नवनीत राणा अन् सुनेत्रा पवारांची भेट; राज्यसभा सीट मिळण्यासाठी फिल्डींग, अमोल मिटकरींची अस्वस्थता, तर छगन भुजबळांच्या नावाचीही चर्चा, घडामोडींना वेग
नवनीत राणा अन् सुनेत्रा पवारांची भेट; राज्यसभा सीट मिळण्यासाठी फिल्डींग, अमोल मिटकरींची अस्वस्थता, तर छगन भुजबळांच्या नावाचीही चर्चा, घडामोडींना वेग
Vaibhav Naik : वैभव नाईक यांच्या मागे पुन्हा एसीबीकडून चौकशीचा सासेमीरा; रत्नागिरी ACB कार्यालयानं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र धाडलं, नेमकं प्रकरण काय?
वैभव नाईक यांच्या मागे पुन्हा एसीबीकडून चौकशीचा सासेमीरा; रत्नागिरी ACB कार्यालयानं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र धाडलं, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Embed widget