एक्स्प्लोर

औरंगाबादमधील गुंडगिरीमुळे 'हमदर्द' कंपनीला 'दर्द'

हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथे कारखाना उभारण्यासाठी आवश्‍यक असलेली बहुतांश रक्कम वितरित केली आहे. आतापर्यंत 150 कोटीं खर्च केलेत.

औरंगाबाद : राज्यात रोजगार उपलब्ध  व्हावा यासाठी मोठे उद्योग यावेत, यासाठी कायम प्रयत्न केले जातात. मात्र आलेल्या उद्योगांना स्थानिकांच्या कटकटीमुळे गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न पडत आहे. औरंगाबाद येथे सुरु होत असलेली 'हमदर्द' कंपनीचा 500 कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प स्थानिकांच्या अडचणीमुळे सुरु होण्याआधीच बंद करण्याच्या विचारात आहे. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'अंतर्गत औरंगाबाद येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हमदर्द कंपनीचा कारखाना उभारण्याचा सामंजस्य करार झाला. कंपनीने कारखान्याला आवश्‍यक असलेल्या औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी 200-300 एकर जागेची आवश्यकता होती. त्यासाठी हमदर्द कंपनीने पैठण आणि गंगापूर या दोन तालुक्यांमध्ये जमीन खरेदी केली. त्या ठिकाणी जमिनीला वॉल कंपाऊंड बांधण्यास सुरुवात केली. दुसरीकडे एमायडीसीतला उद्योग उभारणी सुरु होती. मात्र त्यातच गंगापूर तालुक्यातील कंपनीला गुंडांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप 'हमदर्द'ने केला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये गुंतवणूक करावी की नाही, या विचारात हमदर्द कंपनी पडली आहे. हमदर्द कंपनीने गंगापूरमध्ये 200 एकर जागा घेतली. गेल्या काही दिवसात इथे काही लोकांनी त्यात जमिनीवरती हक्क दाखवत 'हमदर्द'ला तिथे काम करण्यास मज्जाव केला. न्यायालयाचे एक पत्र देखील हमदर्दच्या हातात सोपवलं. औरंगाबादेतील आलेल्या अनुभवाला वाचा फोडण्यासाठी 'हमदर्द'तर्फे उद्योग सहसंचालक, एमआयडीसीचे विभगीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. हे उत्पादन करण्यासाठीच अडचणी येत असतील, तर तिथे प्रॉडक्ट कसं तयार होणार? त्यामुळे हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथील त्यांच्या प्रकल्पाचं काम थांबवलं आहे. हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथे कारखाना उभारण्यासाठी आवश्‍यक असलेली बहुतांश रक्कम वितरित केली आहे. आतापर्यंत 150 कोटीं खर्च केलेत. अशा परिस्थितीत औरंगाबादेतून माघारी जाणे परवडणारे नसले, तरी भविष्यातील धोके पाहता माघार घ्यावी की काय असा विचार सध्या हमदर्दचं संचालक मंडळ करत आहे. औद्योगिक वसाहतीमधील गुंडगिरीला कंटाळून आपल्या राज्यातील मोठमोठे उद्योग शेजारच्या राज्यात जाण्याचा विचार करत आहेत. अशातच राज्यात मोठी गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या हमदर्द कंपनीसारख्या कंपन्या स्थानिकांसाठी किमान 500 जणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते. शहरात होणार्‍या दंगली, उद्योगांवर होणारे हल्ले आणि पाण्याची कमतरता यामुळे उद्योजक औरंगाबादेत यायला तयार नाहीत. त्यातच अशाप्रकारे गुंडगिरी वाढत गेली तर आहे त्यात कंपन्यादेखील शहर सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा फटका औरंगाबादकरांना बसेल, यात शंका नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ? तरीही मनाचा मोठेपणा, मित्र पक्षांसाठी तीन जागा सोडल्या; महायुतीत कुठल्या जागेवर कुणाचं वर्चस्व?
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ? तरीही मनाचा मोठेपणा, मित्र पक्षांसाठी तीन जागा सोडल्या; महायुतीत कुठल्या जागेवर कुणाचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Embed widget