एक्स्प्लोर

औरंगाबादमधील गुंडगिरीमुळे 'हमदर्द' कंपनीला 'दर्द'

हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथे कारखाना उभारण्यासाठी आवश्‍यक असलेली बहुतांश रक्कम वितरित केली आहे. आतापर्यंत 150 कोटीं खर्च केलेत.

औरंगाबाद : राज्यात रोजगार उपलब्ध  व्हावा यासाठी मोठे उद्योग यावेत, यासाठी कायम प्रयत्न केले जातात. मात्र आलेल्या उद्योगांना स्थानिकांच्या कटकटीमुळे गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न पडत आहे. औरंगाबाद येथे सुरु होत असलेली 'हमदर्द' कंपनीचा 500 कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प स्थानिकांच्या अडचणीमुळे सुरु होण्याआधीच बंद करण्याच्या विचारात आहे. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'अंतर्गत औरंगाबाद येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हमदर्द कंपनीचा कारखाना उभारण्याचा सामंजस्य करार झाला. कंपनीने कारखान्याला आवश्‍यक असलेल्या औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी 200-300 एकर जागेची आवश्यकता होती. त्यासाठी हमदर्द कंपनीने पैठण आणि गंगापूर या दोन तालुक्यांमध्ये जमीन खरेदी केली. त्या ठिकाणी जमिनीला वॉल कंपाऊंड बांधण्यास सुरुवात केली. दुसरीकडे एमायडीसीतला उद्योग उभारणी सुरु होती. मात्र त्यातच गंगापूर तालुक्यातील कंपनीला गुंडांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप 'हमदर्द'ने केला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये गुंतवणूक करावी की नाही, या विचारात हमदर्द कंपनी पडली आहे. हमदर्द कंपनीने गंगापूरमध्ये 200 एकर जागा घेतली. गेल्या काही दिवसात इथे काही लोकांनी त्यात जमिनीवरती हक्क दाखवत 'हमदर्द'ला तिथे काम करण्यास मज्जाव केला. न्यायालयाचे एक पत्र देखील हमदर्दच्या हातात सोपवलं. औरंगाबादेतील आलेल्या अनुभवाला वाचा फोडण्यासाठी 'हमदर्द'तर्फे उद्योग सहसंचालक, एमआयडीसीचे विभगीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. हे उत्पादन करण्यासाठीच अडचणी येत असतील, तर तिथे प्रॉडक्ट कसं तयार होणार? त्यामुळे हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथील त्यांच्या प्रकल्पाचं काम थांबवलं आहे. हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथे कारखाना उभारण्यासाठी आवश्‍यक असलेली बहुतांश रक्कम वितरित केली आहे. आतापर्यंत 150 कोटीं खर्च केलेत. अशा परिस्थितीत औरंगाबादेतून माघारी जाणे परवडणारे नसले, तरी भविष्यातील धोके पाहता माघार घ्यावी की काय असा विचार सध्या हमदर्दचं संचालक मंडळ करत आहे. औद्योगिक वसाहतीमधील गुंडगिरीला कंटाळून आपल्या राज्यातील मोठमोठे उद्योग शेजारच्या राज्यात जाण्याचा विचार करत आहेत. अशातच राज्यात मोठी गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या हमदर्द कंपनीसारख्या कंपन्या स्थानिकांसाठी किमान 500 जणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते. शहरात होणार्‍या दंगली, उद्योगांवर होणारे हल्ले आणि पाण्याची कमतरता यामुळे उद्योजक औरंगाबादेत यायला तयार नाहीत. त्यातच अशाप्रकारे गुंडगिरी वाढत गेली तर आहे त्यात कंपन्यादेखील शहर सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा फटका औरंगाबादकरांना बसेल, यात शंका नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget