एक्स्प्लोर

आर्थिकदृष्ट्या आरक्षण हा उथळ विचार: माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत

पुणे: महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दोन महिन्यांपासून मराठा मोर्चांची चर्चा आहे. अॅट्रॉसिटी, आरक्षण, शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर मराठा समाज पहिल्यांदा आक्रमक झाला आहे. तोसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनं. सध्याच्या समाजव्यवस्थेत सर्वांना प्रगतीची समान संधी असली पाहिजे अशी मराठा समाजाची मागणी आहे. त्यामुळंच आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात मागे राहिलेल्या मराठा समाजातील मुलांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. या आणि याच्याशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सोप्या शब्दात त्यांनी आरक्षण आणि इतर प्रश्नाचं विश्लेषण केलं आहे. 'आर्थिकदृष्ट्या आरक्षण हा उथळ विचार' 'आर्थिकदृष्ट्या आरक्षण हा विचार फारच उथळ आहे. आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे. कारण की, नियमाला अपवाद म्हणून आरक्षण असतं. घटनेमध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे मागासवर्गातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.' असं सावंत म्हणाले 'मराठे मोर्चे ही समाज क्रांतीची नांदी' 'मराठा मोर्चांनी एक आदर्श घालून दिला आहे. या मोर्चांमधून झालेल्या एकजुटीतून क्रांती निर्माण व्हायला हवी. मराठा समाजानं काढलेले मूक मोर्चे आणि तिथं कुणालाही भाषणबाजी करण्यास घातलेली बंदी ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. या मोर्चांकडे मी समाज क्रांतीची नांदी म्हणून पाहतो. त्यामुळे क्रांती फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता ती संपूर्ण भारतात व्हावी अशी माझी इच्छा आहे.' असंही सावंत म्हणाले. 'सर्व जाती सांस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर याव्यात' 'आपल्याकडील सर्व जाती सांस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर आल्याशिवाय त्यांच्यात बेटी व्यवहार होणार नाही. मागासलेल्या जाती समूहाला पुढारलेल्या जातींच्या पातळीवर आणायला हवं. हा आरक्षणाचा मूळ हेतू आहे.' असं सावंत म्हणाले. सदोष यंत्रणा सुधारायला हवी 'आरक्षण पुर्नरचेनचा विचार करण्यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, असं करुन चालणार नाही. सर्वात आधी सदोष यंत्रणा सुधारायला हवी. त्यामुळे आरक्षणाच्या पुर्नरचनेचा विचार करता येणार नाही.' असं सावंत यांचं म्हणणं आहे. 'कुठल्याही समाजाचे आरक्षणाने प्रश्न सुटणार नाही' 'कुठल्याही समाजाचे प्रश्न हे आरक्षणाने सुटणार नाही. त्यासाठी घटनेला अभिप्रेत असा समाज आपण घडवायला हवा. आपल्याकडे 85 टक्के मागासलेले आहेत. तर 15 टक्के पुढारलेले आहेत.' असं म्हणत सावंत यांनी घटनेला अभिप्रेत असणारा समाज घडविण्याचं आवाहन केलं आहे. 'प्रस्थापितांना आपलं स्थान प्रबळ करायचं असतं' 'समाजात प्रस्थापित लोकांना आपलं स्थान कायमच प्रबळ करायचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या मुद्दयांना खतपाणी घालणं हे ती लोकं सतत करीत असतात.' असा आरोप सावंतांनी केला. 'अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगावर मार्ग काढायला हवा' 'सध्या अॅट्रॉसिटीबाबत बरीच चर्चा सुरु आहे. अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगावर मार्ग काढायला हवा ही गोष्ट खरी आहे. त्यासाठी काही ठोस तरतुदी करणं गरजेचं आहे. आपल्या राज्यकर्त्यांकडून कल्याणकारी राज्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.' असं सावंत म्हणाले. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त
TET Exam Paper Leak: शिक्षकांनी वर्षभर अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा; आमदाराची मोठी मागणी
शिक्षकांनी वर्षभर अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा; आमदाराची मोठी मागणी

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Embed widget