एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : खवळलेल्या समुद्रात बोटीचा थरार, खलाशांना वाचवण्यात यश
दापोली किनाऱ्याच्या विविध बंदरात नांगरून ठेवलेल्या पाच मच्छिमारी नौका या वाऱ्याच्या तडाख्याने उलटल्या. यामधील 21 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात झालेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा हर्णे येथील मच्छीमारांना बसला आहे. दापोली किनाऱ्याच्या विविध बंदरात नांगरून ठेवलेल्या पाच मच्छिमारी नौका या वाऱ्याच्या तडाख्याने उलटल्या. यामधील 21 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलं असून एका खलाशाचा मृतदेह हाती लागला आहे. तर एकाचा शोध अजूनही सुरु आहे.
त्यातील एक बोट समुद्रात हेलकावे खात असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. या बोटीत काही मच्छिमार होते. पण बोट जोरदार हेलकावे खात असल्यानं या बोटीवरील सर्वच मच्छिमारांनी थेट समुद्रात उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
दरम्यान, दापोलीच्या आंजर्ले, हर्णे या किनाऱ्यांवर काही मच्छिमारी नौका बुडाल्या आहेत. यातील आंजर्लेच्या किनाऱ्यावरील बोट वारा आणि लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यावरील दगडामध्ये येऊन अडकली आहे. या सर्व बोटीतील 20 हून अधिक खलाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे .
यातील बहुतांश खलाशांनी पोहत बाहेर येत आपले प्राण वाचवले. हर्णे येथील रामचंद्र जोमा पाटील यांची भक्ती, हरीश्चंद्र पाटील यांची गगनगीरी तर भारत पेडणेकर व संतोष पावसे यांच्या बोटी लाटांच्या तडाख्याने उलटल्या. यामुळे बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
केवळ दैव बलवत्तर म्हणून 20 हून अधिक जणांचे प्राण वाचले आहेत. रामचंद्र पाटिल यांच्या बोटीवरील सात खलाशांपैकी पाच खलाशांना वाचवण्यात यश आले असून एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. दरम्यान एनडीआरएफची एक टीम पुण्याहून दापोलीकडे रवाना करण्यात आली आहे.
VIDEO :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
करमणूक
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion