एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला : शिक्षणमंत्री उदय सामंत

राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राबद्दल घेतलेल्या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली. यावर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परिक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन आता पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नसून हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असल्याचा आरोप केलाय. तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असे म्हणत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

राज्य सरकारने व्यवसायिक अभ्यासक्रम, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम हा पहिला टप्पा आणि एटीकेटीचा दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात निर्णय घेतले आहेत. व्यवसायिक अभ्यासक्रम परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये झालेला आहे. त्याला मान्यता अभ्यास बॉडीने द्यावा असा निर्णय घेतला आहे. बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मार्क वाढवायचे असल्यास त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सामंत यांनी सांगितले.

राज्यातील 3 लाख 41 हजार 308 एटीकेटी आणि बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांबाबतीत स्पष्ट धोरण आहे. सगळ्या कुलगुरूंशी येत्या दोन-तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करून निर्णय जाहीर करू, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

बॅकलॉग व ATKT च्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? विद्यार्थ्यांसोबत ही तर 'हेराफेरी' : आशिष शेलार

मुख्यमंत्र्यांनी सरासरी गुणांवर ठरवू अशी, घोषणा केली होती. आता त्यातून माघार घेऊन "योग्य सूत्र" विद्यापीठांनी ठरवा सांगून गोंधळ वाढवला, असा आरोप विरोधकांनी केलाय. त्यावर याबाबत गेले पाच वर्षे विरोधक सत्तेत असताना त्यांना विद्यार्थ्यांची काळजी वाटली नाही का? विद्यार्थ्यांच्या विषयी केव्हा ते बोलले नाहीत. दुर्दैवाने जे जे निर्णय घेतले त्यातील 65 जी आर मागे घेतले. आम्ही कुठलाही जी आर अजून मागे घेतलेला नाही. मागे घेण्याचा प्रश्न येत नाही. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांकडे सक्षम व काळजी पोटी बघतायेत. त्याची प्रचिती पालकांना आणि विद्यार्थ्यांना आलेली असल्याचे ते म्हणाले.

विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर द्यायला बंधनकारक समजत नाही : सामंत कृषी विद्यापीठांनी 'आपापले' वेगळे सूत्र ठरवले तर राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल, असाही विरोधकांचा आरोप आहे. विरोधक विद्यार्थ्यांमध्ये नाहक संभ्रम निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतायेत. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणे मी मंत्री म्हणून बंधनकारक समजत नाही. विरोधकांनी टीका करत रहावी, आम्ही आमचं काम करत राहू, असे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नाला दिले.

म्हणून विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलाय विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आम्हाला काळजी आहे. हेच विद्यार्थी भविष्यामध्ये धडा शिकवतील. प्रतिज्ञापत्रात असा कुठेही उल्लेख नाही. त्यांना भिंगाच्या चष्म्यातून व्यवस्थित वाचायला सांगा. लेखी स्वरूपाने कळवावे, असे आहे. अनेक असे सोर्स आपल्याकडे आहेत त्यातून लेखी विद्यार्थी विद्यापीठांना कळवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय झालाय. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असेही सामंत म्हणाले.

Maharashtra Exam | राज्यपालांचा विरोध असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget