एक्स्प्लोर

बॅकलॉग व ATKT च्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? विद्यार्थ्यांसोबत ही तर 'हेराफेरी' : आशिष शेलार

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज अंतिम वर्षातील परीक्षांबाबत निर्णय जाहीर केला. या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. या निर्णयात बॅकलॉग व ATKT च्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केलाय.

मुंबई : अंतिम वर्ष अंतिम सत्र परिक्षेबाबात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हद्वारे निर्णय जाहीर केला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयाबाबत महत्वाचे प्रश्न निर्माण केले आहेत. या निर्णयात बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नसून हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असून आमची भिती खरी ठरली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शासनाच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

पदवी अंतिम वर्षाबाबत गेले अनेक दिवस या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्या माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांनी आज शासन निर्णय जारी झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका केली. प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी केली, हे योग्यच आहे. पण शैक्षणिक आयुष्यात मात्र गोंधळात गोधळ वाढवला आहे. बॅकलॉक व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार? त्यांचा निर्णय सरकार घेणार नाही? हा तर पळपुटेपणा आहे. मुख्यमंत्र्यांनी सरासरी गुणांवर निकाल ठरवू अशी, घोषणा केली होती आणि आता त्यातून माघार घेऊन "योग्य सूत्र" विद्यापीठांनी ठरवा सांगून गोंधळ वाढवला आहे. विद्यापीठांना सूत्र ठरवायला अमर्याद वेळ दिली, मग तुम्ही कसला निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी विचार आहे.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्दच; एटीकेटीबाबत दोन दिवसात निर्णय : शिक्षणमंत्री उदय सामंत

राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल : शेलार  राज्यात 11 कृषी विद्यापीठांनी आपापले वेगळे सूत्र ठरवले तर राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल. मग हे विद्यार्थी देशात स्पर्धेत कसे टिकणार? प्रतिज्ञापत्र द्यायची अट टाकली कसे देणार? प्रत्यक्ष? की ऑनलाइन? मग निसर्ग चक्रीवादळामुळे जिथे वीज नाही, त्यांनी काय करायचे? व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांबाबत काहीच निर्णय नाही. त्यामुळे त्याचे भवितव्य अधांतरीच ठेवण्यात आले आहे. एकुणच राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नाही. हे "शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे" पाप असून अखेर आमची भिती खरी ठरली, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली आहे, अशा शब्दांत त्यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

दरम्यान, पदवी परिक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार आशिष शेलार यांनी पहिल्या दिवसापासून सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरु केला होता. प्रथम मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. तसेच तातडीने राज्यपालांची ही भेट घेतली होती.

MPSC Results | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा प्रसाद चौगुले अव्वल!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sanjay Gandhi National Park : वनसंरक्षकांच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन, मनमानी कारभाराचा आरोप
वनसंरक्षकांच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन, मनमानी कारभाराचा आरोप
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Gairan Land : मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 
मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Embed widget