एक्स्प्लोर

धरणफुटीनंतर सहा महिन्यात तिवरेवासियांसमोर नवं संकट; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

तिवेर धरण फुटल्यानंतर सहा महिन्यात तिवरेवासियांसमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. धरण फुटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांवर वनवन करण्याची वेळ आली आहे.

रत्नागिरी : तिवरे येथील धरण दोन जुलैच्या रात्री फुटले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यात अनेक संसार वाहून गेले यातून सावरत असतानाच तिवरेवासियांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. धरण फुटीमुळे पिण्याच्या पाण्याची झळ ग्रामस्थांना आत्तापासूनच बसू लागली आहे. कारण, धरण फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. परिणामी या धरणातून वाहणारा पाण्याचा प्रवाहही बंद झालाय. त्यामुळे आधी पाण्याने सर्व काही वाहून नेलं आणि आता त्यासाठीच वनवन भटकण्याची वेळ तिवरे गावच्या नागरिकांवर आली आहे. तिवरे धरण फुटल्याने प्रवाहावर वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्यात. हे पाणी जवळपास दहा ते पंधरा गावांची तहान भागवत होते. त्या प्रवाहातून धरण परीसरांत आजुबाजुच्या छोट्याछोट्या गावातील नदी पात्रात ओलावा असायचा. वाडीवस्तीतील लोकांनी प्रवाहाच्या बाजुला विहरी पाडल्या आणि त्या विहरींना बारमाही पाणी होते. या पाण्यावरच गावातील गावकरी पोटाची भुक भागविण्यासाठी भात शेती, भाजीपाला, फुल लागवड करत गुजराण करत. त्यातून त्यांना रोजगार मिळायचा. पण नियतीच्या खेळाने हे सर्व दुर केले आणि जिथे ओलावा होता तीथे कोरडा दुष्काळ झाला. धरण फुटल्याने विहिरीही कोरड्या - धरण फुटून सहा महिने ओलांडले नाही तोच पाण्याची झळ बसू गावकरांना बसू लागली आहे. धरण फुटल्याने नद्या कोरड्या झाल्या, परीणाम पाण्याची पातळी खाली गेल्याने परीसरातील नदी नाला, विहरी, बोरवेल कोरड्या पडल्या असून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या जाणवू लागली आहे. सध्या गावकरी पाण्याची इकडून तिकडून सोय करत आहे. धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार हंडाभर पाण्यासाठी पायपिट - गावकरी डोंगराच्या कपारीतून थिबकणारे पाणी डबक्यात साचल्यावर एक एक हंडा कळशी आळीपाळीने भरत त्याच्यावर दिवस काढत आहेत. या डबक्यात तासंतास पाणी साचण्याची वाट पाहावी लागते. तर काही ठिकाणी गावातील वाडीच्या नळपाणी योजनेच्या विहिरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने सध्या नळपाणी योजना बंद अवस्थेत आहेत. अशा परीस्थितीत आम्ही करायचे काय? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. प्रशासनाला वारंवार सांगूनही प्रशासनाने ठोस पावले उचलेली नाहीत. चार दिवसांतुन एखादा टँकर पाठवला जातो. या एका टँकरवरती जवळपास तीन हजार लोकसंख्या कशी काय आपली तहान भागवू शकते? हे देव जाणे. पाण्याच्या समस्येमुळे काही ग्रामस्थ गाव सोडून मुंबईकडे जाण्याच्या मार्गावर आहेत. VIDEO | तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका; लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने
Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका; लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget