एक्स्प्लोर

लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार

लोकसहभागातून आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅनॉलची झालेली कामे यासाठी उपयोगी ठरली आहेत. ज्यामुळे 20 गावांना मोठा फायदा झाला आहे.

सांगली : दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचं चित्र बदलतंय. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील नेहमी दुष्काळी असणारी 20 गावे आज पाणीदार झाली आहेत. लोकसहभागातून आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅनॉलची झालेली कामे यासाठी उपयोगी ठरली आहेत. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार 2013 साली आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आले होते. मात्र या गावापर्यंत निधीअभावी या योजनेचे पाणी पोहचले नव्हते. मात्र लोकांनी सरकारच्या पैशाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून टेंभू योजनेतून पोट कालवा काढण्याची योजना आखली, ज्याला नाम फाऊंडेशनच्या कामाची देखील साथ मिळाली. आज या लोकसहभागातून झालेल्या कामाने नेहमी दुष्काळाच्या झळात जगणाऱ्या या 20 गावातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळी भाग, पाण्याविना बनलेले ओसाड माळरान हे चित्र उभे राहते. पण हे चित्र देखील बदलण्याची किमया आता साध्य होऊ लागली आहे. आटपाडी तालुक्यातील पश्चिमेकडील 20 गावात, जिथे प्यायला पाणी मिळायचे नाही त्या ठिकाणी ऊसासारखी पिके घेतली जात असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार लोकसहभागातून जवळपास 15-20 किमी काढलेल्या कॅनॉलमधून खानापूर, आटपाडी या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या टेंभू योजनेचे पाणी आज या गावाच्या शेता-शेतात पोहोचलं आहे. त्यामुळे गावात असणारा एक ना एक बंधारा काठोकाठ भरलेला दिसतो. शिवाय नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून या बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जिथे कुसळे देखील उगवत नव्हती, त्या भागात आज हिरवाई पसरलेली आणि शेती बहरलेली दिसून येते. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार पाण्याच्या कमतरतेमुळे आजपर्यंत या भागातील लोक शेतीकडे न वळता पूर्णवेळ मेंढपाळ करणे किंवा शहरात जाऊन कामधंदा शोधणे हीच कामे करत होते. काही गावातील लोक तर ऊस तोडीसाठी देखील कृष्णा नदी काठी येत असत. टेंभू उपसा सिंचन प्रकलपाचे पाणी या भागात जरी आले असले तरी या गावापर्यंत पाणी न पोहोचल्याने त्या पाण्याचा फायदा होत नव्हता. त्यामुळे खरसुंडीजवळ आलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकलपाच्या कालव्यातूनच लोकसहभागातून पोट कालवा काढण्याची कल्पना सुचली आणि काम सुरू झाले. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार वर्षभराच्या कामानंतर तब्बल 20 गावाच्या भोवती 25-30 किलोमीटर लांबी इतके कॅनाल तयार झाले आणि टेंभू योजनेचे पाणी आपल्या गावात येण्याचे लोकांचे स्वप्न पूर्ण झाले. आज या गावांमध्ये ऊसाबरोबरच वेगवेगळी पिके घेतली जातात, त्याशिवाय आजपर्यंत या गावात सुरु असलेले टँकर देखील बंद झाले आहेत. लोकसहभागातून झालेल्या या कामाने कित्येक वर्षे पाण्याची वाट पाहणाऱ्या लोकांच्या दारात आज पाणी पोहोचले आहे. ज्यामुळे या भागातील शेती तर बहरली आहेच, त्याशिवाय दुष्काळी भाग ही ओळख देखील पुसण्यास मदत होऊ लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget