एक्स्प्लोर

अहमदनगरमध्ये तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून दोन गटात राडा, 2 विनयभंगासह 20 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

राड्यादरम्यान महिला सरपंच असलेल्या राणी कातोरे यांनी धक्काबुक्की होऊन मारहाण करण्यात आली. यावेळी समोर असलेल्या दुसऱ्या गटातील महिलेला देखील मारहाण करण्यात आली.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून 2 गटात राडा झालाय. उक्कडगावच्या सरपंच राणीबाई कातोरे यांना मारहाण करण्यात आली. तर दुसऱ्या गटातील महिलेला देखील मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तब्बल 20 जणांवर परस्परविरोधी 2 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शांतताप्रिय असणाऱ्या गावांमध्ये उक्कडगावची ओळख आहे. मात्र 8 सप्टेंबर रोजी गावात तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीसाठी घेण्यात आलेली ग्रामसभा ही शांतता भंग करणारी झाली. ग्रामसभेत अध्यक्ष निवडीवर एकमत न झाल्याने 2 गटात राडा झाला. महिला सरपंच असलेल्या राणी कातोरे यांनी धक्काबुक्की होऊन मारहाण करण्यात आली. यावेळी समोर असलेल्या दुसऱ्या गटातील महिलेला देखील मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटाने बेलवंडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणात 20 आरोपी झाले असून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेलवंडी पोलीस ठाण्यात 2 विनयभंगाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांचे राजकीय हेवेदावे उफाळून आले आणि गोंधळ झाला. दोन्ही गटांना अध्यक्ष हा त्यांचाच हवा होता आणि याच वादामुळे 2 महिलांना मारहाण झाली. बेलवंडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिस तपास करत आहेत.

उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मी स्वतः नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा, असं ट्वीट राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

तंटामुक्त गाव समितीची जबाबदारी

ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती महत्त्वाची भूमिका निभावते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना वादापासून मुक्त करण्यासाठी राबवले गेले. याद्वारे गावपातळीवरील गुन्हेगारी संपुष्टात यावी हा यामागे हेतू होता. राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2007 साली या योजनेची सुरुवात केली. मात्र दिवंगत आर आर पाटील ग्रामविकास मंत्री असताना या योजनेला खऱ्या अर्थाने न्याय दिला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन, जळगावच्या निकालावर महाजन थेटच बोलले..
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?
Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Embed widget