एक्स्प्लोर

सांगलीत हार्दिक पटेलच्या उपस्थितीत धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार

सांगलीतील आरेवाडीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचीही या मेळाव्याला उपस्थिती होती. धनगर समाजाने आरक्षणासाठी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे.

सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप सरकारविरोधात आज धनगर समाजाने रणशिंग फुंकलं आहे. सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम देत राज्यातील भाजपाच्या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात सरकार विरोधात जागृती सभा आयोजित करण्याचा निर्धार दसरा मेळाव्यात करण्यात आला. तसेच मुंबईतील लढ्याचाही चंग बांधण्यात आला आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत सांगलीच्या आरेवाडी येथे हा दसरा मेळावा पार पडला. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून धनगर बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. बिरोबाचं दर्शन घेऊन हार्दिक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य मेळावा सुरू झाला. यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत गेल्या चार वर्षांपासून भाजप सरकार धनगर समाजाला फसवण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप केला. या सरकारने धनगर समाजाला खोटी आश्वासने देण्याचे बंद करून दोन महिन्यात धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा भाजपाच्या विरोधात धनगर समाज जाईल, असा इशारा देत आरक्षण नाही मिळालं तर भाजपा विरोधात मतदान करण्याचं आवाहन यावेळी पडळकर यांनी या मेळाव्यात धनगर समाजाला केलं. हार्दिक पटेल यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं. देशात आज सर्वच समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आले आहेत. मात्र सरकारकडून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. सर्व समाज आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी लढा देत आहे. देशाचा आणि राज्याचा भविष्य आजची तरुण पिढी असून तरुणांनी लढायला शिकलं पाहिजे, असं आवाहन करत धनगर आरक्षणाच्या मागणीला हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दिला. माझ्या येण्याने धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. पण दिल्लीत त्याचा आवाज जरूर पोहोचेल, असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावला. त्याचबरोबर धनगर समाजाने एकजूट होत अस्तित्वाचा आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढा दिला पाहिजे, असं आवाहन करत धनगर समाजाने या मागणीसाठी आता मुंबईमध्ये एकजूट होऊन आरक्षणाची मागणी केली पाहिजे, असं स्पष्ट करत धनगर समाजाला ‘मुंबई चलो’चा नारा दिला आहे. या मेळाव्यात आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातल्या 91 भाजप आमदार त्याचबरोबर खासदार यांच्या मतदारसंघांमध्ये या आरक्षणाबाबत जागृती आणि सरकारविरोधात सभा घेण्याचा निर्धार ही करण्यात आला आहे. पुढील टप्पा हा मुंबईचा राहील आणि त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळेपासून मुंबई असा लाँग मार्च काढून सर्टिफिकेट मिळेपर्यंत मुंबईमध्ये ठिय्या मारण्याचा निर्धार यावेळी समस्त धनगर समाजाने केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RTE Admission : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report
Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget