एक्स्प्लोर

Deepali chavan suicide case | श्रीनिवासा रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; दिपाली चव्हाणच्या बदलीसाठी पैसे खाणारा "तो" कोण ?

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मेळघाटच्या गुगामल वन्यजीवचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पोलिसांनी 26 मार्च रोजी नागपुरातुन पळून जाताना अटक केली

मेळघाट : मेळघाट येथील हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवासा रेड्डी यांनी या प्रकरणात अटक टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा सत्र न्यायालय अचलपूर येथे अटकपूर्व जामिनासाठी 31 मार्च रोजी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली असून श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून कुठल्याही श्रनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मेळघाटच्या गुगामल वन्यजीवचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पोलिसांनी 26 मार्च रोजी नागपुरातुन पळून जाताना अटक केली असून सध्या तो जिल्हा कारागृहात आहे. मात्र शिवकुमार प्रमाणेच त्याला पाठीशी घालणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षेत्र संचालक श्रीनिवासा रेड्डी जितकेच जबाबदार असल्याने त्यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सामान्य जनतेतून होत आहे. निलंबन झाल्यानंतर पोलीस आपल्याला कुठल्याही श्रणी अटक करतील त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी किंवा अटक करण्यापूर्वी किमान सात दिवस आधी नोटीस देण्यात यावी अशी विनंती श्रीनिवास रेड्डी यांनी न्यायालयात केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आहे.

प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे

दीपाली चव्हाण वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली संरक्षक विनोद शिव कुमार बाला यांच्याइतकेच श्रीनिवास रेड्डी हे देखील या घटनेसाठी दोषी आहेत अशी ओरड राज्यभर होत आहे. आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसं निर्देश मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी दिले आहे.
मुख्य वनसरंक्षक अरविंद आपटे यांनी निर्देशात सांगितले की, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी वेळोवेळी दीपाली चव्हाण यांना मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे कंटाळून शेवटी त्यांनी 25 मार्चला त्यांच्या स्वतःच्या शासकीय निवासस्थानी शासकीय पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्या घटनेला विनोद शिवकुमार दोषी आहेत अशी तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांच्या विरोधात धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

26 मार्चला विनोद शिवकुमार यांना निलंबितही करण्यात आले. दिपाली यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये नमूद केल्याप्रमाणे विनोद शिवकुमार यांच्याकडून त्यांना छळ होत असल्याची त्यांनी वारंवार क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिली होती.. दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीची श्रीनिवास रेड्डी यांनी वेळीच दखल घेतली नाही आणि काहीच कारवाई केली नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. वनविभाग आणि वन मुख्यालयाकडे त्याबाबतच्या लोकप्रतिनिधी आणि संघटनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.. त्यामुळे विनोद शिवकुमार यांच्या गैर कृत्यावर एक प्रकारे श्रीनिवास रेड्डी यांनी पांघरून घातल्याचे दिसते. त्यामुळे शिवकुमार इतकच श्रीनिवास रेड्डी देखील जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी आपली जबाबदारी वेळेत पार न पाडल्यामुळे दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करावी लागली. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबईचे अप्पर पोलिस महासंचालक व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रज्ञा सरवदे करणार आहेत. त्या 30 एप्रिल पर्यंत चौकशी अहवाल मुख्य वनसंरक्षक यांना सादर करणार आहेत.

Coronavirus | संसर्गाचे राजकारण रोखा, कोरोनाविरोधातील लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिपाली चव्हाणच्या बदलीसाठी पैसे खाणारा "तो" कोण ?

मेळघाटातील हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. दीपाली यांची मेळघाटात 2014 पासून 2021 पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. आता त्यांना मेळघाटाबाहेर बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांनी सरकारमध्ये कोण्या मंत्र्याला पैसे दिले होते, याचा देखील तपास लागला पाहिजे अशी मागणी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.. मृत दीपालीच्या मेळघाटातील सात वर्षांच्या बदलीनंतर तिला मेळघाटातून बदली हवी होती. यासाठी 'संबंधितांना' (बदलीसाठी पैसे घेणारी यंत्रणा) पैसेही दिले होते. मात्र, पैसे देऊनही बदली होत नसल्याने त्या खचल्या होत्या, असा दावा शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. बदली साठी पैसे घेणाऱ्या त्या नेत्याचे नाव उघड होणे आणि त्यावर देखील कठोर कारवाईची मागणी, शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget