एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus | ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका पुढे, तर होम क्वॉरंटाईनच्या हातावर शिक्का : राजेश टोपे
केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.
![Coronavirus | ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका पुढे, तर होम क्वॉरंटाईनच्या हातावर शिक्का : राजेश टोपे coronavirus rajesh tope on maharashtra corona update Coronavirus | ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका पुढे, तर होम क्वॉरंटाईनच्या हातावर शिक्का : राजेश टोपे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/15223437/rajesh-tope.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच शाळा आणि महाविद्यालय आता संपूर्ण राज्यभरात बंद राहतील असंही त्यांनी सांगितलं. तसेच महाविद्यलयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कुलगुरूंना सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
घरी कॉरंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का
राजेश टोपे यांनी सांगितलं की, जे लोक बाहेरील बाधित 7 देशातून आले आहेत त्यांना A, B, C अशा कॅटॅगरीमध्ये ठेवले जाणार आहे. A म्हणजे ज्यांच्यात लक्षण आहे त्यांना वेगळं ठेवलं जाणार. B मध्ये वयोवृद्ध आहे ज्यांना डायबिटीस, हायपर टेन्शन आहे त्यांना पण 14 दिवस कॉरेंटाईन मध्ये ठेवणार. 14 दिवस लक्षण आढळली नाहीत तर ट्रीटमेंट होणार नाही. C मध्ये लक्षण नाही त्यांना घरी कॉरेंटाईन करणार. घरी कॉरंटाईन केलेल्या लोकांना निवडणुकीत मारला जातो त्याप्रमाणे हातावर शिक्का मारला जाणार. जेणेकरून हे लोक बाहेर दिसले तर बाहेर कळेल हे घरी कॉरंटाईन आहेत. अशा लोकांनी घरात राहावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
· राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.
· ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.
· कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.
· क्वॉरंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या.
· ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.
· केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.
· आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.
· उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
· नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.
· होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
· धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion