एक्स्प्लोर

अमित शाहांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला का? : बाळासाहेब थोरात

वांद्रे येथील घटनेनंतर ट्विटरवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा हॅशटॅग सुर झाला होता, तो कसा झाला माहित नाही. अशा घटनांमधून राजकारण होतंय का असा संशय बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

मुंबई : वांद्रे येथील गर्दीच्या घटनेनंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वांद्रे येथील गर्दीच्या घटनेचं राजकारण होतंय का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला, तसा गुजरात आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फोन केला होता का? असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

वांद्रे येथील गर्दीची घटना घडल्यानंतर ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हॅशटॅग सुरु झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा द्यावा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा, अशा मागण्या ट्विटरवर सुरु झाल्या होत्या. ट्विटरवर असे हॅशटॅग कसे सुरु होतात हा देखील प्रश्न आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

लोकांना रस्त्यावर एकत्र येऊन गर्दी केल्याची घटना केवळ वांद्रे येथेच घडलेली नाही. याआधी सूरतमध्ये अशी घटना दोनदा घडली आहे. हैदराबादमध्ये घडली, केरळमध्ये घडली आहे, आणखी काही ठिकाणी अशा घटना  घडल्या आहेत. वांद्रे येथील घटना घडल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. मात्र गुजरात आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी फोन केला होता का? किंवा त्या राज्यांमध्ये ट्विटरवर असे हॅशटॅग फिरु लागले होते का? हे मला माहित नाही, मात्र याचं कारण काय? या घटनांमध्ये राजकारण तर होत नाही ना. सध्याच्या परिस्थितीचं राजकारण करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे. त्यामुळे असं राजकारण करणे चुकीचं आहे, असं थोरात यांनी म्हटलं. तर काही लोक या घटनांना धार्मिक स्वरुप देत आहेत, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

वांद्रे येथे जे लोक जमले होते, त्यांची गैरसोय होते, त्यांना अन्नधान्य मिळत नाही, असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही. गेल्या महिनाभरापासून ते मुंबईत अडकले आहेत. त्यांच्या हातात काम नाही, घरात ते कोंडून आहेत. त्यांची घरंही छोटी छोटी आहेत. या सर्वांमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी परत जाऊद्या अशी त्यांची मागणी होती, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं.

वांद्रे येथे नेमकं काय घडलं?

मंगळवारी (14 एप्रिल) दुपारी वांद्रे स्टेशन बाहेरील जामा मशिदीच्या जवळ हजारो लोक जमले होते. यामध्ये अधिक परप्रांतीय मजूर होते. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या मजुरांची मागणी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सर्वांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केले. मात्र गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. त्यानंतर गर्दी नियंत्रणात आली. लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मे पर्यंत बंद आहे. राज्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातात कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न या मजुरांपुढे आहे. मात्र एवढी मोठी गर्दी याठिकाणी कशी जमली की ती जमवली होती. या अशा अनेक बाबींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

संबंधित बातम्या :

Bandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget