एक्स्प्लोर

युद्धज्वर निर्माण करणारी भाषणं म्हणजे अपयश लपवण्याचा प्रयत्न : रत्नाकर महाजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण हे शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन जाणारं असल्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलं आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे.

मुंबई : कोरोनाचं संकट राज्यात वाढलं आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने राज्यातल्या जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या भाषणात लोकांना विश्वास देण्यासह घाबरुन न जाता सहकार्य करण्याची भाषा असते. त्यांचं भाषण हे शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन जाणारं असल्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलं आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे. युद्धज्वर निर्माण करणारी आणि अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा रत्नाकर महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे. आपल्या फेसबुक पोस्टवरुन त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची, व्यवहार्य उपायांची गरज आहे, असल्याचं म्हटलं आहे. आपल्या या वक्तव्यावर खुलासा करताना त्यांनी दुसरी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, समाज माध्यमांवर मी एक विचारी भारतीय नागरिक म्हणून व्यक्तिशः कार्यरत असतो. तिथल्या माझ्या प्रत्येक विधानाचा व प्रतिपादनाचा संबंध सध्या मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी आहे त्या काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा अगोचरपणा करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. महाजन यांनी म्हटलं आहे की, ही लढाई नव्हती, नाही !, कोरोना हा एक आजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारत की लडाई, शिवरायांचा महाराष्ट्र , लढवय्या महाराष्ट्र , या लढाईत लढणारे शूर सैनिक .... अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 17 मे नंतर टाळेबंदी आणखी वाढविणे अनुचित,अव्यवहार्य आणि लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे ठरेल. तसेच ते सरकारी यंत्रणा व नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेचे द्योतक ठरेल, असं देखील त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. दुसरीकडे, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कॉंग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget