एक्स्प्लोर

युद्धज्वर निर्माण करणारी भाषणं म्हणजे अपयश लपवण्याचा प्रयत्न : रत्नाकर महाजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण हे शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन जाणारं असल्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलं आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे.

मुंबई : कोरोनाचं संकट राज्यात वाढलं आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने राज्यातल्या जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या भाषणात लोकांना विश्वास देण्यासह घाबरुन न जाता सहकार्य करण्याची भाषा असते. त्यांचं भाषण हे शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन जाणारं असल्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलं आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे. युद्धज्वर निर्माण करणारी आणि अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा रत्नाकर महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे. आपल्या फेसबुक पोस्टवरुन त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची, व्यवहार्य उपायांची गरज आहे, असल्याचं म्हटलं आहे. आपल्या या वक्तव्यावर खुलासा करताना त्यांनी दुसरी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, समाज माध्यमांवर मी एक विचारी भारतीय नागरिक म्हणून व्यक्तिशः कार्यरत असतो. तिथल्या माझ्या प्रत्येक विधानाचा व प्रतिपादनाचा संबंध सध्या मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी आहे त्या काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा अगोचरपणा करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. महाजन यांनी म्हटलं आहे की, ही लढाई नव्हती, नाही !, कोरोना हा एक आजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारत की लडाई, शिवरायांचा महाराष्ट्र , लढवय्या महाराष्ट्र , या लढाईत लढणारे शूर सैनिक .... अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 17 मे नंतर टाळेबंदी आणखी वाढविणे अनुचित,अव्यवहार्य आणि लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे ठरेल. तसेच ते सरकारी यंत्रणा व नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेचे द्योतक ठरेल, असं देखील त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. दुसरीकडे, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कॉंग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडं राज्याचं लक्ष, निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, कसा असेल कार्यक्रम
मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडं राज्याचं लक्ष, निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, कसा असेल कार्यक्रम
आईसह चार मुलांना विषबाधा, तीन चिमुकल्यांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं बुलढाणा हादारलं
आईसह चार मुलांना विषबाधा, तीन चिमुकल्यांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं बुलढाणा हादारलं
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget