एक्स्प्लोर

शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबतच्या युतीमध्ये सडली, मुख्यमंत्री ठाकरेंचा पुनरुच्चार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडली, असा पुनरुच्चार केला आहे.

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पुन्हा भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना त्यांनी पुन्हा शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं. तसे हे सगळे गजकर्णी, म्हणजे राजकारणातले, नाहीतर पुन्हा एकदा मथळा यायचा की मी त्यांना गजकर्णी म्हटलं. मी त्यांना राजकारणाचं गजकरण आहे, म्हणून मी बोलतोय, असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेबांचं दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न येत्या काळात पूर्ण करणार, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

...तर आज आपला पंतप्रधान असता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता, असंही ते म्हणाले.

आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही?

उद्धव ठाकरे म्हणाले की, "फेब्रुवारीत भेटलो होतो. त्यावेळी आपण राज्यभर शिवसंपर्क मोहिम राबवायचं ठरवलं होतं. पण कोरोनाची दुसरी लाट आली. आतासुद्धा दिवाळीच्या सुमारास राज्यभर फिरायचं, सगळ्यांचं दर्शन घ्यायचा विचार करत होतो पण थोडं माझं मानेचं दुखणं वर आलं. माझी शस्त्रक्रिया करावी लागली. कोरोनाच्या लाटेमागून लाटा येऊ शकतात. आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही? व्हायरस त्याची लाट एकामागे एक आणत असेल तर आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाहीत? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

लवकरात लवकर बाहेर पडणार, महाराष्ट्र पिंजून काढणार
"शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी लावलेल्या वृक्षाचे फळं आपण चाखत आहोत. आज आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी तंत्रज्ञानामुळे भेटतच आहोत. आपल्याला कुणी अडवू शकत नाही. आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनी आलेलो आहे. मधले दोन महिने उपाचारात गेलो. मी लवकरात लवकर बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. तुमच्यासोबत तुमच्या साक्षीने भगव्याचं तेज आहे, जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं काळजीवाहू हे विरोधक आहेत. स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे", असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढणार
एकट्यानं लढा म्हणायचं आणि सत्तेचा गैरवापर करायचा. हरलो तरी घरी घाबरायचं नाही, बघू किती दिव हरणार. पण आता लढणार. महाराष्ट्राबाहेर देखील आपण निवडणूक लढवायची.राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्याही बड्या नेत्यांनी प्रचारात उतरावं. सत्तेचा कसा वापर अधिक कसा करता येईल, याचा विचार करा आणि काम करा. हातात बळ नसेल, तर एकहाती सत्ता शक्य नाही. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीसारखं लढायला शिका. सत्तेचा वापर अधिक कसा करता येईल याचा विचार करा आणि काम करा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

हे देखील वाचा- 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget