एक्स्प्लोर

मुख्यमंत्री झालात, पुढे काय करणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले माझा 2 महत्वाच्या गोष्टींवर भर असणार

जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. याचा मला आनंद आहे, जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी हे यश दिलं असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं.

CM Devendra Fadnavis : जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. याचा मला आनंद आहे, त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव देखील झाली. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी हे यश दिलं असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. महाराष्ट्र (Maharashtra) आता थांबणार नाही याचा अर्थ अडीच वर्षापूर्वी आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही राज्याला ट्रॅकवर आणलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, तर मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले होते. आता पुढच्या काळात प्रकल्पांना वेगाने पुढे नेणार आहोत. येत्या काळात माझा भर हा नदीजोड प्रकल्पावर असणार आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रीन एनर्जीवर भर असणार आहे, असं फडणवीस म्हणाले. 

रोजगाराची निर्मिती होणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीडी सह्याद्रीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी आता चार प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करु शकतात असे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रीन एनर्जीवर देखील माझा भर राहणार आहे. 2030 मध्ये 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असेल असंही फडणवीस म्हणाले. याचा शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. यामुळं रोजगाराची निर्मिती होईल, अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल असेल असे फडणवीस म्हणाले. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी करायच्या आहेत. सगळ्या योजना चालवायच्या आहेत. 

धारावीच्या प्रकल्पाबाबात नेमकं काय म्हणाले फडणवीस?

धारावीची संकल्पना राजीव गांधीच्या काळात मांडली होती. यावर कोणत्याचं सरकारन काहीच केलं नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा जीपीआर तयार केला. हा प्रकल्प करायचा असेल तर जास्त जागा लागणार म्हणून आम्ही रेल्वेकडून जागा विकत घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचं टेंडर काढलं. विकासक देखीस नेमला होता. त्यावेळी विकासक हे काय गौतम अदानी नव्हते. मात्र, तरीदेखील महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्यांनी टेंडर रद्द केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आताचे जे नवीन टेंडर तयार केलं आहे ते उद्धव ठाकरे यांचे सरकारपनं तयार केले आहेत. यातील एकच गोष्टी मी बदलली आहे. ती म्हणजे टीडीआरचे कॅपिंग करा हे सांगितलं. मार्केट रेटच्या 90 टक्के किंमत करता येईल, त्यापेक्षा जास्त किंमत करता येणार नाही. त्याचा डिजीटल प्लॅटफॉर्म असेल हे देखील सांगतल्याचे फडणवीस म्हणाले. नियमात बसणाऱ्यांना धारावीतच घर देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. जे नियमात बसत नाहीत नाहीत, त्यांच्यासाठी रेंटल हाऊसिंग करायचे ठरले आहे. 10 ते 12 वर्षानंतर थोडे पैसे भरले की ते घर त्यांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. गरीबासाठी घर देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे फडणवीस म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

एकनाथ शिंदे म्हणाले, मी 20 वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, मग तुम्ही कोण; देवेंद्र फडणवीस म्हणतात....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
Sushma Andhare: अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget