एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

Maharashtra Infrastructure News : राज्यातील पायाभूत प्रकल्पांची कालमर्यादेत गतिमान उभारणी करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

मुंबई : राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची गतिमान उभारणी करा. यात वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये योग्य संतुलन राखत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून शासनाच्या धोरणांद्वारे विकासाची समान संधी सर्व भागांमध्ये निर्माण केली जावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्रीफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूम येथे उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच प्रकल्पांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि त्यांना गती देण्याच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी आवश्यक निर्णय या आढावा बैठकीत घेण्यात आले. 

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर देशाच्या सागरी व्यापाराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्याच्या उभारणीसाठी आवश्यक परवानग्या आणि भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि निर्यात धोरणाला चालना देणारा ठरणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेसाठी सोमवारी कार्यआदेश देण्यात यावेत, लोअर पेंढी प्रकल्प ग्रस्तांना तातडीने जागा देण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. 

या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, जलस्रोत व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. तसेच वर्धा - नांदेड रेल्वे मार्ग आणि वडसा - गडचिरोली प्रकल्पाचे भूसंपादन वेगवान करावे, तुळजापूर मंदिर विकास आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा, छत्रपती संभाजीनगरच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि वाढती पाणी टंचाई लक्षात घेता जलपुरवठा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना आरओबीचा प्रश्न मार्गी लावावा आणि पहिला टप्पा 31 मार्च पर्यंत सुरू करावा.  विरार - अलिबाग मल्टी मॉडेल कॅरिडोरचे सर्वेक्षण पुढील महिन्यात पूर्ण करावे, जालना - नांदेड मुल्यांकनाचे प्रश्न तातडीने सोडवावेत, मुळा मुठा नदी संवर्ध जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा. बीडीडी चाळ पुनर्विकास, वरळी ट्रान्झिट इमारत लवकर उपलब्ध करून द्यावी. मुंबई मेट्रो 3 जून जुलैपर्यंत पूर्ण करावा. वाढवण बंदरासाठीची संपूर्ण जागा 31 मार्च पर्यंत देण्यात यावी आणि पालघर विमानतळासाठी सल्लागाराची नेमणूक करावी अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. 

मुंबईसह राज्यभरातील मेट्रो, रेल्वे, महामार्ग, विमानतळ, बंदरे, सिंचन, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांतील एकूण १९ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये निम्न पेडी सिंचन प्रकल्प, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना, विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, वांद्रे - वर्सोवा सि लिंक, ठाणे रिंग मेट्रो, ना.म. जोशी मार्ग,  नायगाव, पुणे रिंग रोड, पुणे मेट्रो - 3 आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प आदी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. 

मुख्यमंत्र्यांनी  प्रामुख्याने प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, भूसंपादन, पुरवणी मागणी आणि कार्यवाही प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवण्यात यावी असे निर्देश दिले.

पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्याच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार आहे आणि वेळेची व इंधनाची बचत होईल. 

तसेच, श्री तुळजाभवानी मंदिर परिसर सुशोभीकरण योजनेद्वारे यात्रेकरूंसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून पर्यटन क्षेत्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, वाढवण बंदर ते नाशिक मार्गाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासह वाढवण येथे नवीन विमानतळ उभारणीच्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याबाबत संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचेही आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबांना आक्रमकपणे तोंड द्यावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या विलंबास संबंधित विभागांना जबाबदार धरले जाईल आणि आवश्यक ती तातडीची पावले उचलली जातील. यासोबतच, प्रत्येक प्रकल्पासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल, जेणेकरून प्रकल्प वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होतील. संबंधित विभागांनी ठराविक कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि संसाधनांचा योग्य वापर करावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेचा कहर! गुजरातमधील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर विपरित परिणाम; हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेचा कहर! गुजरातमधील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर विपरित परिणाम; हवामान विभागाचा अंदाज काय?
Rohini Khadse : 'सरकारचा दुटप्पीपणा, आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले'; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा आकडेवारी देत सरकारवर हल्लाबोल
'सरकारचा दुटप्पीपणा, आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले'; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा आकडेवारी देत सरकारवर हल्लाबोल

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
Iran War Live Update: तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
Gas Shortage Thane: मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
Shivam Dubey Travel In Train: छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Embed widget