Breaking News LIVE : बेळगाव जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Breaking News LIVE Updates, 18 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

Background
तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं
तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. भारतीय हवामान विभागाने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदतकार्य वेगाने सुरु ठेवण्याचे आदेश
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने आज मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत थैमान घातले. यात झालेल्या नुकसानीचा आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
चांगली बातमी! राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. आज तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर आज नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
इंदापूर उजनीच्या ५ टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द
इंदापूर उजनीच्या ५ टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द, सांगोला शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार तर आमदार संजय शिंदे यांनी मानले अजित पवार यांचे आभार
इंदापूरला उजनीचे 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द
इंदापूरला उजनीचे 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द. सांगोला शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार तर आमदार संजय शिंदे यांनी मानले अजित पवार यांचे आभार.























