Breaking News LIVE : बेळगाव जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Breaking News LIVE Updates, 18 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं
तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. भारतीय हवामान विभागाने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदतकार्य वेगाने सुरु ठेवण्याचे आदेश
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने आज मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत थैमान घातले. यात झालेल्या नुकसानीचा आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
चांगली बातमी! राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. आज तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर आज नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
इंदापूर उजनीच्या ५ टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द
इंदापूर उजनीच्या ५ टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द, सांगोला शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार तर आमदार संजय शिंदे यांनी मानले अजित पवार यांचे आभार
इंदापूरला उजनीचे 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द
इंदापूरला उजनीचे 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द. सांगोला शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार तर आमदार संजय शिंदे यांनी मानले अजित पवार यांचे आभार.
पिंपरी चिंचवडमध्ये उद्यापासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार
पिंपरी चिंचवडमध्ये उद्यापासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 ते 122 दिवसांनी देण्याच्या सूचना आली आहे. त्यामुळे उद्या 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीचा केवळ पहिला डोस मिळेल. तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस मिळेल. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दिला जाईल.
'कोवॅक्सिन' लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला डीसीजीआयची मान्यता
'कोवॅक्सिन' लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (डीसीजीआय) मान्यता, येत्या 10-12 दिवसांत क्लिनिकल ट्रायल सुरू होईल, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांची माहिती
सोलापूर : अंत्ययात्रेतील गर्दीत सहभागी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 50 आरोपींना जामीन
सोलापूर : अंत्ययात्रेतील गर्दीत सहभागी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 50 आरोपींना जामीन, सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या 200 पैकी 50 जणांना पोलीस केली होती अटक, शासकीय कामात अढथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आदी कलम खाली दाखल करण्यात आला होता गुन्हा, मात्र केवळ एका दिवसात प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर 50 आरोपींना जामीन
रासायनिक खतांची दरवाढ ही भारतीय शेती उद्धवस्त करणारी आहे, राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
रासायनिक खतांची दरवाढ ही भारतीय शेती उद्धवस्त करणारी आहे, राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या पोरांनो याला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही, #stopfertilizerhike वापरून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन, 20 मे रोजी केंद्र सरकारच्या प्रतिमेचे आपापल्या शेतात दहन करा, राजू शेट्टी यांचं आवाहन
औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेणाऱ्या 16 रुग्णाचा मृत्यू
औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार घेणाऱ्या 16 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 7 रुग्णांवर उपचार सूरु आहेत. 171 रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या 16 रुग्णांपैकी 4 हे औरंगाबाद शहरातील रुग्ण असून इतर हे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यातून औरंगाबाद शहरात उपचार घेण्यासाठी आले होते. 7 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर CBI चा छापा
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर CBI चा छापा
खतांच्या वाढत्या किमती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांचे रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र
खतांच्या वाढत्या किमती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांचे रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र. या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आणि किमतीतील वाढ लवकर मागे घेण्याची विनंती.
कोल्हापुरात शाहूपुरी पाच बंगला परिसरातील श्री सिद्धी गणेश मंदिरात चोरी
शाहूपुरी पाच बंगला परिसरातील श्री सिद्धी गणेश मंदिरात चोरी चोरट्यांनी गणेश मूर्तीचे चांदीचे कान, चांदीचा पाळणा आणि दान पेटीवर मारला डल्ला. तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets