एक्स्प्लोर

'...अन्यथा लक्षात ठेवा 3 कोटी धगनर बांधवांशी गाठ!' गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र

धनगर समाजाच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा गाठ 3 कोटी धगनर बांधवांशी असल्याचे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले आहे.

Gopichand Padalkar : मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज आहे. माझ्या समाजाचा वापर आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावी, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. अशा लोकांना मला सांगायचे आहे की, धनगर समाजाच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा लक्षात ठेवा गाठ 3 कोटी धगनर बांधवांशी आणि गोपीचंद पडळकरबरोबर आहे, असे म्हणत पडळकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहले आहे. 

स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला एसटी (ST) चा दाखला मिळत नाही, तोपर्यंत ती कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं दाखवली. फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी "जे आदिवासांना ते धनगरांना"  हे धोरण राबवले. जोपर्यंत धनगर समाजाला एसटी चे सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आदिवासींना लागू असलेल्या 22 कल्याणकारी योजना फडणवीस सरकारने लागू केल्या. त्यासाठी 1 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन 3 कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केले असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.


...अन्यथा लक्षात ठेवा 3 कोटी धगनर बांधवांशी गाठ!' गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र

पत्रात नेमकं काय म्हणालेत पडळकर

गेल्या 30 वर्षात धनगर समाज आपल्या आपल्या अधिकार आणि हक्कासाठी लढत आहे. आरक्षणाची मागणी करतोय. परंतू, आजतागायत प्रस्थापितांच्या सरकारने भूलथापांच्या पलिकडे काहीही दिले नाही.2014 साली फडणवीस सरकारने प्रथमच धनगर समाजच्या आरक्षणाच्या मागणीला गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. जोपर्यंत धनगर समाजाला एसटी चे सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आदिवासींना लागू असलेल्या 22 कल्याणकारी योजना फडणवीस सरकारने लागू केल्या. या 22 कळ्याणकारी योजनांमुले धनगर समाजातील युवकांना शेक्षणिक शिष्यवृत्ती, वसतीगृहे, सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महमेष योजना योजना ते घरकूल योजना महाराष्ट्रात लागू झाल्या. मात्र, या योजना लागू झाल्या आणि राज्यात सरकार बदलले. फडणवीस सरकारने वर्ग केलेल्या निधीपैकी एक पैसाह धनगर समाजासाठी या सरकारला खर्च करता आला नसल्याचे पडळकरांनी अजित पवारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


...अन्यथा लक्षात ठेवा 3 कोटी धगनर बांधवांशी गाठ!' गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र

सध्या धनगर समाजा विविध समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढावे म्हणून सामाजिक न्याय स्थापीत करणे गरजेचे आहे. मागच्या अर्थसंकल्पत आपण फडणवीस सरकारने केलेल्या योजनांचे बाह्य रुप बदलून नवीन घोषमा केल्या आहेत. परंतू या योजना कागदावर राहिल्या असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्यासाठी तुम्हा घोषणा केल्या होत्या का? असा सवाल धनगर समाजाच्या मनात येत असल्याचे पडळकरांनी पत्रात म्हटलंय. अस्तित्वार प्रश्न उभा राहिला की, साधी मुंगीसुद्धा बलाढ्य हत्तीला लोळावते. तुम्ही 3 कोटी धनगर समाजाला हिणकस वागणूक देत असल्याचे पडळकरांनी म्हटले आहे. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरी आपण सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा, आश्वासनाचं पोत फिरवू नये. अन्यथा तुम्हा करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचे पडळकरांनी पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
GDP Growth : मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Embed widget