एक्स्प्लोर

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको : चंद्रकांत पाटील

येत्या निवडणुकीत विजयासाठी सहयोगी पक्षाला जिंकवणं तितकंच महत्वाचं आहे. निवडणूक होऊन निकाल लागणं ही फक्त औपचारिकता आहे. निकाल आजच लागला असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई : काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, अशी सूचक प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आज चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी याला पद नाही, जबाबदारी म्हणतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचे राज्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला 51 टक्क्यांहून जास्त मतदान मिळालं. 227 च्या जागांमध्ये आम्ही पुढे आहोत. त्यात वाढ होईल पण कमी होणार नाही, असेही पाटील म्हणाले. येत्या निवडणुकीत विजयासाठी सहयोगी पक्षाला जिंकवणं तितकंच महत्वाचं आहे. निवडणूक होऊन निकाल लागणं ही फक्त औपचारिकता आहे. निकाल आजच लागला असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेने सत्तेत असून मोर्चा काढला आणि महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले तर त्यात काही चूक नाही. सरकार चुकत असेल तर सत्तेत असलेल्या प्रत्येक सहयोगी पक्षाने सरकारवर अंकुश ठेवलाच पाहिजे, असे पाटील म्हणाले. कालच मंत्रिमंडळ बैठकीत पीक विमाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आढावा घेतला होता. 2300 कोटींचा प्रीमियम भरून 15 हजार कोटींचे परतावे मिळाले ही आजपर्यंत सर्वाधिक रक्कम आहे, असेही ते म्हणाले. घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी त्यांना जागा द्याव्या लागतील. जागा वाटपावर चर्चेला बसू तेव्हा आकड्यांवर एकमत करून निर्णय करू. युतीच्या बाबतीत प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट या प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकू असा निर्धार व्यक्त करतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मोदींजींचे सेनापती म्हणून दादांना जबाबदारी : मुख्यमंत्री चंद्रकांत दादा गेली साडेचार वर्षे अनेक खाती, जबाबदारी, विधानपरिषदेतील काम सक्षमपणे पाहत आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून प्रतिमा उभी केली आहे. पण त्यांचा मूळ पींड संघटनात्मक कार्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दादा गेली 25 वर्षं फिरले आहेत. मला विश्वास आहे की मोदींजींचे सेनापती म्हणून दादांना ही जबाबदारी मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आणि साडेचार वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना पदभार सोडावा लागला आहे. भाजपमध्ये संघटनेला अनन्य साधारण महत्व आहे. जे गेल्या 50 वर्षात आधीच्या सरकारला जमलं नाही ते काम सरकारने पावणे पाच वर्षांत केलं आहे याचा अभिमान आहे. नूतन अध्यक्षांच्या माध्यमातून भाजप घरा घरात, मना मनात पोहचेल याचा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget