एक्स्प्लोर

Bird Flu in Maharashtra LIVE Updates | परभणी : मुरुंबा पाठोपाठ असोला गावतही कोंबड्यांचा मृत्यू, दोन शेतकऱ्यांच्या 22 कोंबड्या मृत्युमुखी

Bird Flu in Maharashtra LIVE Updates : कोरोनापाठोपाठ देशासह राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रातील परभणी, बीड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईतही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

LIVE

Bird Flu in Maharashtra LIVE Updates | परभणी : मुरुंबा पाठोपाठ असोला गावतही कोंबड्यांचा मृत्यू, दोन शेतकऱ्यांच्या 22 कोंबड्या मृत्युमुखी

Background

Bird Flu in Maharashtra LIVE Updates : कोरोनाचं संकट देशातून काढता पाय घेत नाही, तोच देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये परसलेला हा संसर्ग आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवियन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. ज्यानंतर उत्तराखंडमध्येही याचा फैलाव झाल्याची बाब निदर्शनास आली. सध्याच्या घडीला हे संकट थोपवून लावण्यासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. दरम्यान, अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळं अंडी आणि चिकन खाण्यावर, विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाहीत.

 

देशात कुठवर पसरला आहे बर्ड फ्लू?

 

आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळत आहे.

 

मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन

 

मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या चाचणी अहवालातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर सतर्क होत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये पक्षी कुठंही मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी 1916 या क्रमांकावर संपर्क साधत याबाबतची माहिती देण्याची विचारणाही करण्यात आली आहे.

 

पंतप्रधान मोदी म्हणतात, सावध व्हा!

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पसरणाऱ्या बर्ड फ्लूचा आढावा घेत नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय स्थानिक जलस्त्रोतांच्या आजुबाजूला, प्राणसंग्रहालयात आणि कुक्कुटपालन केंद्रांतील परिस्थितीचा आढाव घेत इथं काटेकोरपणे नजर ठेवण्यावर जोर दिला. वन विभाग, आरोग्य विभाग आणि पशुपालन विभाग यांच्यातील जास्तीत जास्त समन्वय हे संकट थोपवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

12:20 PM (IST)  •  13 Jan 2021

परभणी : मुरुंबा पाठोपाठ असोला गावतही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. दोन शेतकऱ्यांच्या 22 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. गावाजवळ अनेक मृत कोंबड्या आढळून आल्या आहेत. मुरुंबा गावापासून 7 किलोमीटर अंतरावर असोला गाव आहे. जिल्ह्यात मुरुंबा, कुपटा, बनवस आणि असोला या 4 गावांत हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
10:44 AM (IST)  •  13 Jan 2021

परभणीच्या मुरुंबा गावांमध्ये बर्ड फ्लूने दगावलेल्या कोंबड्यां नंतर उर्वरित राहिलेल्या तब्बल साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुरुंबा गावात तब्बल 80 जणांचे 7 पथक दाखल झाले असुन कोंबड्यांना अनेस्थेसिया दिला जात आहे यानंतर त्यांचे पॅकिंग करून गावाच्या बाहेर करण्यात आलेल्या खड्यांमध्ये त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.
10:06 AM (IST)  •  13 Jan 2021

लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथे 400 कोंबड्या अचानकपणे मृत पावल्या होत्या. त्याच पाठोपाठ जिल्ह्यातील सुकणी आणि वंजारवाडी येथेही अश्याच घटना घडल्या होत्या. या मृत कोबड्याचा अहवाल प्राप्त झाला त्यात बर्ड फ्ल्यू झाल्याचं समोर येताचं प्रशासनाने या भागात अलर्ट झोन घोषित केला होता. या भागातून कोणत्याही प्रकारे पक्षी,अंडी किंवा मांस याची वाहतूक बंद केली होती. केंद्रेवाडी येथील ज्या चारशे कोंबड्या मृत झाल्या होत्या त्याच्या बाजूला बायलर कोबड्याचा पोल्ट्री फार्म आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून या ठिकाणच्या 8000 हजार तसेच या भागातील इतर छोटे मोठे कोंबड्या पालन करणारे अनेकांच्या कोंबड्या या प्रशासनाने रात्रीच नष्ट केल्या. ही संख्या 10 हजार पेक्षा अधिक आहे. जिल्ह्यासाठी 10 समिती आणि प्रत्येकी पाच जणांचे 30 पथक तयार करण्यात आले आहे. जे जिल्हाभरातील घटनेवर निगराणी ठेवणार आहे.
08:56 AM (IST)  •  13 Jan 2021

कोरोनाकाळात अफवेचा बळी ठरलेला पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे . बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर चिकनची मागणी घटल्याने जिवंत कोंबडीच्या दरात 25 ते 30 रुपयांनी, तर किरकोळ विक्रीच्या दरात 40 ते 50 रुपयांनी घट झाली आहे. अंड्यांचे दरही नगामागे पन्नास पैसे ते एक रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज सत्तर कोटींचे नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महिनाभरात सुमारे दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
12:36 PM (IST)  •  12 Jan 2021

परभणी : परभणीच्या मुरुंबा गावातील 1800 पेक्षा जास्त कोंबड्या बर्ड फ्लुने मेल्यानंतर उर्वरित साडेसहा हजार कोंबड्या आज नष्ट केल्या जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी इतर विभागाच्या पथकांसह गावात दाखल झाले असून सात पथकानं मार्फत या कोंबड्यांचं किलिंग म्हणजेच नष्ट केल्या जाणार आहेत. दरम्यान गावही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ग्राम पंचायत निवडणूक असताना गावात शांतता पाहायला मिळत आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget