एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ABP CVoter)
बीडचे राष्ट्रवादीचे नेतेच पक्ष संपवतील : पंकजा मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवाराने ऐनवेळी माघार घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची अगतिकता आहे, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
''बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहत केल्याशिवाय राहणार नाहीत,'' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
''राष्ट्रवादीमधील पवार घराण्याचा लॉयल लोकांवर अन्याय होतो आणि अपमानास्पद वागणूक मिळते, त्याचंच फलित म्हणजे सुरेश धस आमच्याबरोबर आहेत,'' असंही त्या म्हणाल्या.
''बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि बंधू रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतली, राजकारणाच्या इतिहासात असं कधीच झालं नाही. अधिकृत उमेदवार माघार घेतो ही राष्ट्रवादीची अगतिकता आहे. त्यातही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, आता आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत, आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही ताकत लावू, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे
लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला. कारण, भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं. मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्वीस्ट आला आहे.
विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम
स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.
संबंधित बातम्या :
पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!
उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?
आता भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही : पंकजा मुंडे
विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
निवडणूक
नाशिक
Advertisement