एक्स्प्लोर

"जनतेचं ठरलंय, वारं फिरलंय", "परमनंट आमदार"; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होर्डिंगबाजी

मुख्यमंत्री कोल्हापुरात येणार म्हणून समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत शहरात जागोजागी होर्डिंग लावले होते. विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेली साडेचार वर्ष समरजीत घाटगे यांनी विविध कायर्क्रमातून जोरदार मोर्चेबांधणी केली.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होर्डिंगबाजी सुरु झाली आहे. "जनतेचं ठरलंय, वारं फिरलंय", "परमनंट आमदार" अशा होर्डिंग कोल्हापुरातील कागल भागात लावण्यात आल्या आहेत. या होर्डिंगची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू महाराज व इतर मान्यवर कोल्हापुरात आले होते. मुख्यमंत्री येणार म्हणून समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत शहरात जागोजागी होर्डिंग लावले होते. विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेली साडेचार वर्ष समरजीत घाटगे यांनी विविध कायर्क्रमातून जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा कोल्हापुरात आले.

कागल मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, परंतु शिवसेनेला हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याने सलग दोन वेळा मुश्रीफ आमदार म्हणून निवडून आले. राज्यात युतीचं सरकार आलं त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांत स्वत: लक्ष घातलं.

जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं आणि कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हापरिषदेत भाजपचा अध्यक्ष झाला. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांनी मोर्चे काढून आणि विविध मार्गांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन हा मतदारसंघ शिवसेनेकडून आपल्याकडे घ्या आणि समरजीत घाडगे यांना युतीचा उमेदवार म्हणून घोषित करा, असे प्रयत्न चंद्रकांत पाटलांनी सुरु केल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात "परमनंट आमदार" या होर्डिंगवरुन हसन मुश्रीफ यांचा खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या दहा वर्षात कागल तालुक्यात विविध योजना आणून त्याचा जनतेला फायदा करून दिला आहे, म्हणून त्यांना कागलच्या मतदारांनी "श्रावणबाळ" अशी उपमा दिली आहे. तर दिवंगत विक्रमसिंह घाडगे यांच्या विकासाचा वारसा घेऊन गेले चार ते साडे चार वर्ष समरजीत घाडगे कागलच्या जनतेपर्यंत पोहचत आहेत. म्हणूनच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत "आमचं ठरलय" हे वाक्य कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण राज्यभर गाजलं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निडणुकीत मतदार जनतेने ठरवल्याप्रमाणे वारं फिरवतात की राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हेच 'परमनंट आमदार' राहतात हे येणारा काळच ठरवेल.

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget