एक्स्प्लोर

गरीबांच्या खात्यात पैसे नसल्याने दंड वसुलीतून बँका मालामाल

आपल्या सरकारी तिजोरीला बसलेला हा खड्डा बँका कसा भरुन काढतात, त्याची एक आकडेवारी समोर आली आहे, जी पाहून तुम्हाला धक्का बसेल.

नवी दिल्ली : विजय मल्ल्या 9000 कोटी, नीरव मोदी..14 हजार कोटी.. ही बडी धेंडं आपल्या सरकारी बँकांना इतका मोठा चुना लावून विदेशात आरामात बसली आहेत. आपल्या सरकारी तिजोरीला बसलेला हा खड्डा बँका कसा भरुन काढतात, त्याची एक आकडेवारी समोर आली आहे, जी पाहून तुम्हाला धक्का बसेल. 2017-18 या एका आर्थिक वर्षात देशातल्या बँकांनी जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय. हा दंड कशासाठी, तर अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवला नाही म्हणून. 21 राष्ट्रीय आणि तीन खासगी बँकांची एका वर्षातली ही दंडाची रक्कम आहे. दंड वसुलीत एसबीआय अव्वल एसबीआय या दंडवसुलीत सर्वात आघाडीवर आहे. या एका बँकेने 2433 कोटी रुपये दंडापोटी वसूल केलेत. तर खासगी बँकांमध्ये एचडीएफसी 590 कोटीच्या आकड्यासह दंडवसुलीत प्रथम क्रमांकावर आहे. अॅक्सिस बँकेने 530, आयसीआयसीआयने 317 कोटी रुपये वसूल केलेत. मिनिमम बॅलन्सचा नियम प्रत्येक बँकेची मिनिमम बॅलन्सबद्दलची अट वेगळी आहे. मेट्रो सिटीत एसबीआयचा मिनिमम बॅलन्स 3000 रुपये आवश्यक आहे. तुमचा बॅलन्स 2999 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत घसरला, तर तुम्हाला 30 रुपये दंड ठोठावला जातो. हा बॅलन्स 1499 रुपये ते 750 रुपयांपर्यंत घसरला, तर 40 आणि त्याच्याही खाली घसरला तर 50 रुपये बँक दंड म्हणून वसूल करते. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांना मिनिमम बॅलन्सची अट नाही. पण एकीकडे सरकार अधिकाधिक बँक खाती उघडण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देतंय, तर दुसरीकडे बँक खातेदारांकडूनच दंडाची रक्कम वसुली करत आहे. बँकांना सर्व्हिस चार्जेस लावण्याचे अधिकार आरबीआयने दिलेले आहेत. त्यामुळेच ही दंडाची वसुली होते हे खरंय. पण दुर्दैवाने नियम सर्वांसाठी सारखे नाहीत. मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवू शकत नाहीत असे लोक कोण आहेत... हे सगळे गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत. यांना कायद्याची भीती वाटते, ते न चुकता कर भरतात. पण यांच्या खात्यातली रक्कम कापताना बँकांना नियम आठवतात, अगदी कडकपणे त्याची अंमलबजावणीही होते. मग हाच नियम, हाच धाक दहा हजार कोटी रुपये लुबाडून विदेशात जाणाऱ्यांना कधी लागणार? जे बँकांचे अधिकारी सामान्यांना डोळे वटारतात, ते उद्योगपतींच्या पायाशी मात्र लोळण घेतात. हा भेदभाव ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी देशातल्या बँकिंग व्यवस्थेचे खरे सुदिन येतील.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget