एक्स्प्लोर

ठाकरे बंधू ते जयंत पाटील ते बाळासाहेब थोरातांनी धडाधड पुरावे मांडले; निवडणूक आयोगाच्या कारभाराची पोलखोल, मतदारयादीमधील घोळ समोर आणला

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना थोरात यांनी बोगस मतदारांवरून गंभीर आरोप केला.

ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोग (केंद्रीय आणि राज्य) आणि मतदारयादीमधील दोषांबाबत गंभीर मुद्दे उपस्थित यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. विधानसभेला ज्या मतदारयाद्या होत्या त्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये सांगूनही त्या दोषांसह निवडणूक पार पडल्याचे थोरात म्हणाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना थोरात यांनी बोगस मतदारांवरून गंभीर आरोप केला. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला, आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. एकत्रित बैठक केली. परंतु, आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे उत्तर आम्हाला दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे, असे थोरात म्हणाले. 

विधानसभेला घोटाळे केलेली मतदारयादी होती

बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही नावे वगळली गेली. काहींचे परत परत नावे दिसत आहेत. एका घराच्या नावावर अनेक आहेत. थोरात यांनी सांगितलं की, "माझं एखाद कॉलेज आहे किंवा माझ कॉलेज हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले आलेली मुलं सुद्धा माझे मतदार असं होणार असेल. निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत तक्रार करूनच त्याची दखल नाही. अशा स्थितीत अनेक घोटाळे करून केलेली मतदारयादी विधानसभेची होती. 

आता आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही

बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ती मतदार यादी एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिली. यादी दिल्यानंतर कोणतही पुनर्विलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलं नाही. कोणत्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत. पुन्हा नवीन नाव नोंदण्यासाठी मोहीम करण्यात आली नाही. ते म्हणाले की, सगळ्या दोषांसहित एक जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिली आहे. जे चुकीच आहे ते दुरुस्त केलं पाहिजे होतं, पण ते केलेलं नाही. ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची असूनही त्यांनी काहीच केलेलं नाही. आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही. 

पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे 

या घोळामध्ये दोष असलेली पूर्णपणे यादी मतदानाला जाणार आहे. ही काय निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही. या सर्व बाबींवर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही, अशी अवस्था आहे. या सर्व दोषांसहित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीच आहे आणि जनतेला मान्य नाही. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा तोच उद्धवस्त करण्यात निघालेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे अस आम्हाला वाटतंय, असा आरोपही त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget