एक्स्प्लोर

औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली

कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली

औरंगाबाद: औरंगाबादमधल्या कचरा प्रश्नाने आता उग्र रुप धारण केलं आहे. कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली आणि कचराडेपोच्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. महापुरुषांच्या प्रतिमा समोर मांडून नागरिक भजन आंदोलन करत आहेत. आज सोळाव्या दिवशी महापालिकेने तीसगाव परिसरातील गोलवाडी कचरा डेपो परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गोलवाडी आणि तीसगाव परिसरातील नागरिकांनी हा प्रयत्न हणून पाडला. एक छोटी रिक्षा कचरा घेऊन आली असता नागरिकांनी त्यावर दगडफेक केली.  यावेळी जमावाला समजवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रशासन आणि राज्य शासनाकडून विभागीय आयुक्त यांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत काढत, त्यांना 3 महिने मुदतीची मागणी केली.  यात नारेगावच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासोबत, नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही आयुक्तांनी तयारी दर्शवली. मात्र गावकरी त्यांच्या आधीच्या निर्णयावर ठाम आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास गावकरी तयार नाहीत. त्यामुळं प्रशासनाने आज तोडगा काढण्याच्या केलेला प्रयत्न असफल ठरला. गावकरी पुन्हा गावात जाऊन लोकांसोबत चर्चा करणार आणि त्यानंतर पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. काय आहे औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न? गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. कारण, गेल्या 16 दिवसांपासून शहरातून कचरा उचलला गेलेला नाही. औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो. मात्र, तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र निश्चिंत आहेत. विशेष म्हणजे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज नारेगावच्या ग्रामस्थांशी होणाऱ्या चर्चेत विभागीय आयुक्तांना यश मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Maharashtra HSC 12th Result 2026: मोठी बातमी : बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या निकालाचा टक्का पुन्हा घसरला, पाच वर्षातील सर्वात कमी टक्के निकाल!
मोठी बातमी : बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या निकालाचा टक्का पुन्हा घसरला, पाच वर्षातील सर्वात कमी टक्के निकाल!
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?
बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी; नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी
बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Mumbai-Pune Expressway Missing Link : गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल, कोणत्या नंबरवर पाठवाल?
बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल? जाणून घ्या एकाच क्लिकवर...
Embed widget