एक्स्प्लोर

औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली

कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली

औरंगाबाद: औरंगाबादमधल्या कचरा प्रश्नाने आता उग्र रुप धारण केलं आहे. कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली आणि कचराडेपोच्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. महापुरुषांच्या प्रतिमा समोर मांडून नागरिक भजन आंदोलन करत आहेत. आज सोळाव्या दिवशी महापालिकेने तीसगाव परिसरातील गोलवाडी कचरा डेपो परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गोलवाडी आणि तीसगाव परिसरातील नागरिकांनी हा प्रयत्न हणून पाडला. एक छोटी रिक्षा कचरा घेऊन आली असता नागरिकांनी त्यावर दगडफेक केली.  यावेळी जमावाला समजवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रशासन आणि राज्य शासनाकडून विभागीय आयुक्त यांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत काढत, त्यांना 3 महिने मुदतीची मागणी केली.  यात नारेगावच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासोबत, नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही आयुक्तांनी तयारी दर्शवली. मात्र गावकरी त्यांच्या आधीच्या निर्णयावर ठाम आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास गावकरी तयार नाहीत. त्यामुळं प्रशासनाने आज तोडगा काढण्याच्या केलेला प्रयत्न असफल ठरला. गावकरी पुन्हा गावात जाऊन लोकांसोबत चर्चा करणार आणि त्यानंतर पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. काय आहे औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न? गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. कारण, गेल्या 16 दिवसांपासून शहरातून कचरा उचलला गेलेला नाही. औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो. मात्र, तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र निश्चिंत आहेत. विशेष म्हणजे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज नारेगावच्या ग्रामस्थांशी होणाऱ्या चर्चेत विभागीय आयुक्तांना यश मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
Manoj Jarange: आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर जरांगेंचा संताप: म्हणाले 'जर तुम्ही रोखणार असाल तर...'
आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर जरांगेंचा संताप: म्हणाले 'जर तुम्ही रोखणार असाल तर...'
Manoj Jarange Mumbai Agitation: मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली
मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
XI Jinping: ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Embed widget