एक्स्प्लोर

उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट; विदर्भात वादळी पावसाचा इशारा

ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. तर, विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

मुंबई : उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. चंद्रपूर, परभणी, हिंगोलीत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस कोसळलाय. तर, विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. अरबी समुद्रातून सध्या वारे वाहतायत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश ते तमिळनाडूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झालंय. प्रामुख्याने विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील काही भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भामध्ये 10 ते 12 मार्च या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मागील आठवड्यात अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. दोन मार्चला सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे कर्जमाफीतून सावरलेला शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने मंगरुळपिर बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्याच मोठं नुकसान झालं. तर शेतात उभं असलेल्या रब्बी पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचे विधानसभेत पडसाद; देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले... हिंगोली हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री आणि सकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार झटका दिलाय. औंढा नागनाथ, वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील काही भागात रात्री दोन वाजता आणि सकाळी नऊ वाजता जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गहू, हरभरा, ज्वारीची काढणी सुरू असतानाच हा पाऊस झाल्यानं पिकांची मोठी हानी झालीय. तर, कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, रामेश्वर तांडासह परिसरात पावसाला सुरुवात झाली. परभणी हिवाळा संपत आला अन् उन्हाळा सुरू होत आला तरीही अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. परभणीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावलीय. तब्बल 15 मिनिटं शहरात हलक्या सरी बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून काढणीला आलेला गहू आणि हरभरा पिकांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच बदलत्या हवामानाचा फळ पिकांनाही चांगलाच फटका बसतोय. Unseasonal rain | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा; ज्वारी, हरभरा, गव्हाचं मोठं नुकसान बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा शहरासह काही ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मोताळा शहरासह तालुक्यातील डिडोळा, शेंबा या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील गहु, हरबरा पिकाला फटका बसलाय. चंद्रपूर चंद्रपूर शहरातील वातावरणात अचानक बदल होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. होळी-रंगपंचमीच्या पर्वावर गर्दी वाढत असताना यामुळे खरेदीला ब्रेक लागलाय. तर, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. Non-Seasonal Rain | अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानावर विधानसभेत नेत्यांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget