एक्स्प्लोर

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जयंत  पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil : भारताच्या इतिहासात कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी जितकं काम केलं तितके कोणीची केले नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पवारांचे काम समजून घेतले असते तर त्यांना प्रश्न पडला नसता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जयंत  पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवला. पिकांना चांगला हमी भाव दिला, फळबागांना अनुदान दिले, हॉर्टीकल्चरची सुरू केली. त्यामुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत. कांदा, केळी अशा पिकांसाठी संशोधन केंद्र उभे केल्याचे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांवर प्रचंड विश्वास 

अमित शाह जर देशात फिरले तर त्यांना शेतकरी सांगेल की त्यांचा सातबारा पवार साहेबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीने कोरा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना त्यानंतर त्यांनी पॅकेजही दिले. एफ आर पी चे धोरण आणले त्याची कडक अंमलबजावणी केल्याचे जयंत पाटील म्हणाले. अशा अनेक गोष्टी मी सांगू शकेल, त्याला दिवस कमी पडेल. त्यामुळे वारंवार महाराष्ट्र येऊन अमित शाह यांनी पवार साहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करु नये असे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांवर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही प्रश्न उपस्थित केल्यानं जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले. 

 260 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन शरद पवारांच्या काळात झालं

कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी उत्तम काम केलं आहे. अन्न धान्य उत्पादनात शरद पवार कृषिमंत्री असताना 60 दशलक्ष टन वाढ झाली. एकेकाळी अन्न धान्याची आयात करणारा देश निर्यात करायला लागला. वाजपेयी काळात आधारभूत किमंती वाढलेल्या होत्या. 260 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन शरद पवारांच्या काळात झालं. 2013 मध्ये पहिल्यांदा भारताने 100 दशलक्ष टन तांदळाची निर्मिती केली. साऱ्या जगाने त्यावेळी वाहवाह केली. राष्ट्रीय फळबाग अभियान शरद पवारांनी सुरू केलं. राष्ट्रीय फलोत्पादन वर 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचा फायदा असा झाला की 60 लाख हेक्टर ओलिताखाली आले. त्याचा फायदा देशांतर्गत गरज भागवून देशाला 14 हजार कोटी रुपये परकीय चलन मिळाल्याचे जयंत पाटील म्हणाले. 80 लाख हेक्टर क्षेत्रावर 147 दशलक्ष टन भाज्या उत्पादन होतं होत्या. 14 हजार कोटी रुपये भाज्या निर्यात केल्यामुळं पैसे मिळतात. 

शेतकरी कर्जमाफी शरद पवारांनी केली

देशात शेतकरी कर्जमाफी शरद पवारांनी केली. 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी केली होती. शेतकरी सातबारा कोरा केला.दुष्काळात महाराष्ट्राला 2200 कोटी रुपये दिले. द्राक्ष बागायतदार उभे केले. एफआरपी सारखा कडक कायदा त्यांनी केला त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget