एक्स्प्लोर

प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार उतावीळ? मिटकरींचा टोला, जयंत पाटलांचं केलं कौतुक 

शरद पवार गटात जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला होणारा विरोध हा त्यांचा मराठा द्वेष दाखवतो का? असा सवाल करत आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली.

Amol Mitkari : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिंतन शिबिरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी काही नेत्यांनी केली आहे.‌ यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.‌ शरद पवार गटात जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला होणारा विरोध हा त्यांचा मराठा द्वेष दाखवतो का? असा सवाल त्यांनी केलाय. जयंत पाटलांवर स्तुतीसुमनं उधळतांना मिटकरींनी त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कामांचा दाखला दिला आहे. यासोबतच प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार उतावीळ झालेत का?  असा सवालही त्यांनी केलाय. जयंत पाटलांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे अनेक दुर्योधन शरद पवार गटात असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. 

जयंत पाटील प्रत्येक बूथपर्यंत गेले त्यांनी मोठं संघटन केलं

दरम्यान, काही महिन्यापूर्वीच सांगितलं होतं जयंत पाटील यांचा कुणीतरी करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत आहे. तेच काल दिसल्याचे मिटकरी म्हणाले. मराठा प्रदेशाध्यक्ष सोडून कोणीही करा, असा हट्ट होतो. त्यांच्यात मराठा द्वेष भरला आहे का? असा सवाल मिटकरींनी केलाय. जयंत पाटील यांच्यासारखा मोठा नेता, ते प्रत्येक बूथपर्यंत गेले. मोठं संघटन त्यांनी केलं. अशा एवढ्या मोठ्या नेत्याला हटवण्याचा घाट घातला जातोय असे मिटकरी यांनी म्हटलं आहे. #जितेंद्र आव्हाडांनाच अथवा कर्जत जामखेडच्या आमदाराला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे का?असा सवालही यावेळी मिटकरींनी केला. जयंत पाटील यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेणारे अनेक दुर्योधन तिकडे आहेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला. दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या टाकळी येथील माऊली उमेश सोट या तरुणाच्या प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी सरकारकडे केली. 

राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी आव्हान दिलं आहे. पुढच्या दोन दिवसात प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं दिली त्याचा डेटा द्या, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं जयंत पाटील म्हणाले. पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागलं असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 

महत्वाच्या बातम्या:

Jayant Patil : ... तर 8 दिवसात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो; प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी करणाऱ्यांना जयंत पाटलांचं आव्हान 

 

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget