एक्स्प्लोर

Popatrao Pawar : दुष्काळाची चाहूल, पाण्याचा ताळेबंद आखून शेतकऱ्यांनी पावलं टाकवीत; पोपटराव पवारांचं आवाहन

राज्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची (Drought) चाहूल लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा ताळेबंद आखून पुढील पावलं टाकणं गरजेचं असल्याचं मत आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पाटील यांनी व्यक्त केलं.

Popatrao Pawar : सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची (Drought) चाहूल लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा ताळेबंद आखून पुढील पावलं टाकणं गरजेचं असल्याचं मत आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पाटील (Popatrao Pawar) यांनी व्यक्त केलं. राज्य सरकारनं आतापासूनच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याबाबत नियोजन करणं गरजेचं असल्याचीही सूचना त्यांनी केली. एबीपी माझानं त्यांची संपर्क साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

दुग्ध व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता

सध्या राज्यातील अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळं खरिपाचं पीक वाया जाण्याची भीती आहे. पावसानं ओढ दिल्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. पावसाच्या या पार्श्वभूमीवर 100 टक्के पीक वाचवण्यासाठी प्रयत्न न करता काही पीक सोडून द्यावं लागेल असे पवार म्हणाले. पिण्याचं पाणी, जनावरांच्या चारा पिकासाठीचं पाणी आणि फळबागा वाचवण्यासाठी लागणारं पाणी याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितलं. सरकारनं आतापासूनच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याबाबत नियोजन करणं गरजेचं आहे. ही खबरदारी न घेतल्यास, जनावरांच्या चाऱ्याच्या किंमती ऐनवेळी गगनाला भिडतील अशी भीती पोपटराव पवारांनी व्यक्त केली आहे. 

अपुऱ्या पावसामुळं खरीपाची पीकं वाया जाण्याची भीती

राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अने जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आमि कोकणात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हातची पीकं वाया जाण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळं राज्यात पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पाणीटंचाईचं संकट आल्यास शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळं या संकटापूर्वीच शेतकऱ्यांमी पाण्याचं आणि चाऱ्याचं योग्य ते नियोदन करणं गरजेचं आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली. मात्र, या चालू ऑगस्ट महिन्यात पावसानं चांगीच दडी मारली आहे. पावसाच्या या स्थितीमुळं शेतकऱ्यांची मका, कापूस, सोयाबीन, मूग , बाजरी, तूर पीकं करपू लागली आहेत.  खरिपाचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

महत्त्वाच्या बातम्या:

El Nino : एल निनोचं आगमन, अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून जाहीर; नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget