एक्स्प्लोर

Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष, आदित्य ठाकरेंचे राज्यपाल बैस यांना पत्र, कारवाईचीही केली मागणी

Aaditya Thackeray : राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहित ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी केलीये.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरु असलेला अनागोंदी कारभार आणि त्यामुळे  महाराष्ट्राचे होणारे अपिरमीत नुकसान याबाबत राज्यपलांनी हस्तक्षेप करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलीये. यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये मुंबईशी निगडीत अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर सुरु असलेल्या सावळ्यागोंधळाची कारणमिमांसाही त्यांनी राज्यपालांकडे या पत्राद्वारे मांडली आहे. राज्यात सध्या अनेक प्रश्न हे प्रलंबित असल्याचं चित्र सध्या आहे. त्याचसाठी ठाकरे गटाकडून राज्यपाल बैस यांना पत्र लिहिण्यात आलय. 

दरम्यान मुंबई महापालिकेतील घोटाळ्यासंदर्भात देखील आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल देखील केलाय. तर या पत्राद्वारे राज्यपाल बैस यांना पत्र लिहून आदित्य ठाकरेंनी कारवाईची देखील मागणी केलीये. बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असले तरी राज्याचे मुख्यमंत्री असलेले महोदय स्वत: च्या ताब्यात ठेवलेल्या आणि लोकांच्या सेवेसाठी असलेल्या नगरविकास विभागाच्या मुख्य कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी लिहिलेल्या या पत्रावर राज्यपाल कोणती कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

पत्रात नेमकं काय म्हटलं?

आदित्य ठाकरेंनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई महानगरपालिकेच्या विविध घोटाळ्यांचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी या पत्रात केलाय. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सध्या सत्तेत असलेल्या  असंवैधानिक सरकारने केलेले घोटाळे, त्यात रस्ते घोटाळा, रस्त्यावरील फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, किंवा सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा यावर वारंवार तुमच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. या घोटाळ्यांची लोकायुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी करून तुमचं लक्ष वेधल्यावर प्रशासनाला ध्यानाला आले असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. 

दरम्यान आदित्य ठाकरेंनी  मुंबई मेट्रो, वरळीतील डिलाईट रोड पुल,  मुंबई ट्रान्स हॅबर लिंक प्रकल्प, बेस्ट बस यावरून देखील मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधलाय. या सगळ्या कामांचा देखील उल्लेख आदित्य ठाकरेंनी या पत्रात केलाय. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबई पालिकेतील कर्मचारी आणि बेस्टमधील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत देखील या पत्रात काही मुद्दे मांडले आहेत. 


Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष, आदित्य ठाकरेंचे राज्यपाल बैस यांना पत्र, कारवाईचीही केली मागणी

हेही वाचा : 

Rohit Pawar : छगन भुजबळांना सभा घ्याव्या लागताहेत, कॅबिनेटमध्ये त्यांचं ऐकलं जात नाही हे स्पष्ट; रोहित पवारांची प्रतिक्रिया

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget