एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची 'समृद्धी'?
सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत.
मुंबई : सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत.
याची सत्यता एबीपी माझाने तपासलेली नाही. मात्र महाराष्ट्राची समृद्धी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात का दिली, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा आहे.
आंदोलक शेतकऱ्यांच्या ग्रुपवर फिरणाऱ्या एका क्लिपमुळे मोपलवार यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.
'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे? मोपलवार - जाल मेहता नाव सांगितलं ना तुम्ही? मध्यस्थी - हो.. जाल मेहता. मोपलवार - त्याला सांगा आपण त्याला 15 हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट देतोय. मध्यस्थी - कुठे? मोपलवार - अरे तो बोरीवलीचा.. त्याला मंत्रालयात काही द्यावे लागतील.. आपल्याकडे..त्याला कोट करा 1 कोटी रुपये.. मध्यस्थी - अच्छा मोपलवार - त्याला आपण दिलेल्या प्लॉटमुळे हजार स्क्वेअर फुटचे 50 फ्लॅट विकायला मिळतील... मंत्रालयात 1 - 2 दिले तर ती जमीन मिळून जाईल. मध्यस्थी - म्हणजे टोटल मंत्रालय पकडून त्याला 4 करोडचा खर्च आहे.. मोपलवार - एक दोन पकडून काय असेल ते असेल... आपल्याकडे एकच्या खाली घेणार नाही.. नाहीतर सोडून द्या विषय. कुठल्याच फ्रेममध्ये बसत नाही ते मध्यस्थी - नियमबाह्य आहे म्हणून एवढं करावंच लागेल मोपलवार - 1500 मीटर, त्यात स्लम असल्यामुळे 2.5 चा एफएसआय मिळेल. एकूण त्याला 50 हजार स्क्वेअर फिटचे फ्लॅट सेल करायला मिळतील. 10 हजार पर स्क्वेअर फिट जरी म्हटलं तरी 50 कोटी रुपयांचे फ्लॅट होतील. त्यात 30 - 40 कोटी खर्च म्हटला तरी 10 कोटी त्याचा फायदा आहे. मध्यस्थी - त्याला वाढवून सांगू की आहे तसच? मोपलवार - सांगा तुम्ही... आधी काय म्हणतोय बघू.. मोपलवार - अशोक सखाराम उबाळे या हिरोचा फोन आला..त्याला नाही म्हणून सांग.. मध्यस्थी - काय म्हणून? मोपलवार - कुठल्या तरी मंडल अधिकाऱ्याची वसई जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात बदली करायला. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बदली जमत नाही... नाही म्हणून सांग त्याला..बाकी त्याला सांगून टाक.या संभाषणात मोपलवार आहेत की नाहीत, याची पुष्टी आम्ही करत नाही... पण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या या आणि अशा अनेक ऑडिओ क्लिप्सची जोरदार चर्चा आहे. समृद्धी प्रकल्प कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. असं असलं तरी प्रशासकीय कौशल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समृद्धीची जबाबदारी मोपलवार यांच्यावर सोपवली आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षातील आमदारांकडून मोपलवारांवर गंभीर आरोप केले जात आहेत. मोपलवारांची कारकीर्द वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली. मोपलवारांचं स्पष्टीकरण
''माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.'' असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं.सोशल मीडियावर व्हायरल होणारा मजकूर कोणी आणि किती गांभीर्याने घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र एखाद्या होऊ घातलेल्या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याच्या चारित्र्यावर शंका घेतल्या जात असतील, तर त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या गतिमान आणि पारदर्शक सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित होऊ नये एवढी भाबडी अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगायला हरकत नसावी. पाहा व्हिडिओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
क्राईम
Advertisement