एक्स्प्लोर

Cyclone Tauktae : तोक्ते वादळामुळे सिंधुदुर्गात जवळपास 125 कोटींच्या नुकसानीची शक्यता, पंचनामे अद्याप सुरु

आजच्या दिवसापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ 120 कोटी तर नुकसान झालेली आहे तर उद्या संध्याकाळ पर्यंत 125 कोटी रुपयांच नुकसान वाढू शकते.

सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना दिलासा दिला आहे. पंचनामे दोन दिवसात पूर्ण होतील, नुकसानीचा आकडा हा शासनाकडे येईल आणि कोकणवासीय नाराज होणार नाही, अशा पद्धतीचा कोकणवासीयांना भरीव मदत दिली जाईल, असं कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. 

कालच्या दौऱ्यानंतर अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की ते कोकणात कोणाच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आले नव्हते तर कोकणवासियांना दिलासा द्यायला आले होते. भविष्यात कोकण किनारपट्टीला कायमस्वरूपी काय उपाय योजना करता येईल, यासाठीसुद्धा आराखडा करण्याचे निर्देश काल मुख्यमंत्र्यांनी दिले. आजच सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानीची आढावा बैठक घेतला. त्या आढावा बैठकीत सद्यस्थितीत जवळजवळ 85 ते 90 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. आजपर्यंत घरांचे नुकसान झालेले आपल्याला दिसतंय ते साडेसात हजार घरांच्या नुकसान भरपाईची योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आखावी लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. परंतु 85 ते 90 टक्के पंचनामे झाले असतील असं आपण म्हटलं तर घरांच्या पंचनाम्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. 

आपल्याकडे मनुष्यहानी 4 झालेली आहे. आजच मदत व पुनर्वसन मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसान आढावा बैठक घेत आहेत. ते स्वतः मृतांना नुकसान भरपाई देणार आहेत. शेतीचे नुकसान, जलसिंचन असेल या सर्व नुकसानीची आकडेवारी 20 कोटीपर्यंत जाईल, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल याच सहा कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. पशुधनाचे नुकसान 1 कोटी 20 लाख रुपये पर्यंत झालंय.

महावितरणचे आतापर्यंतचे नुकसान 35 कोटींपर्यंत झाले आहे. मत्स्य व्यवसायाचे सुमारे अडीच कोटीचं नुकसान झालेलं आतापर्यंत पाहायला मिळत आहे.  मच्छीमारांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंशतः 74 बोटीचं तर पूर्णतः 35 बोटीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अंशतः 71 बोटीचं तर पूर्ण 3 बोटीचं नुकसान झालं होतं. जिल्ह्यातील मच्छीमारांची जाळी 1173 अंशतः तर 7102 जाळीचं नुकसान झालेलं आहे. 

आजच्या दिवसापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ 120 कोटी तर नुकसान झालेली आहे तर उद्या संध्याकाळ पर्यंत 125 कोटी रुपयांच नुकसान वाढू शकते. रत्नागिरी जिल्ह्यात घरांची आकडेवारी आहे त्यात चार ते साडेचार हजार घरांचे अंशतः घरांचे नुकसान झाले आहे. मात्र हा आकडा भविष्यात वाढू शकतो. 

दोन्ही जिल्ह्यांची आकडेवारी आणि त्याचे पंचनामे उद्या संध्याकाळपर्यंत शासनाला पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली मदत लवकरात लवकर महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाहीर करतील. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आज पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. उद्या नाना पटोले सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर होते. विरोधी पक्षनेते सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. जे नेते केंद्र सरकारच्या निगडित होते, त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत किनारपट्टीला मदत मिळवावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी तातडीने केंद्र सरकारच्या यंत्रणेला विनंती केली पाहिजे. पंतप्रधानाना विनंती केली पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफ याचे निकष बाजूला ठेऊन या कोकण किनारपट्टीला दिलासा दिला गेल पाहिजे.

उदय सामंत यांनी कोकणवासियांना सांगितलं की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौऱ्या झाला शासनाला सर्व पंचमामे पोहोचल्यानंतर जास्तीत जास्त मदत आंबा बागायदार, मच्छीमार, काजू बागायतदार , घरांची पडझड झालेली आहे यांना व्यवस्थितरित्या मदत दिली जाईल, अशा पद्धतीचं आश्वासन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana Marriage Postpond : वडिलांची प्रकृती बिघडली, स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलला
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं  का नाही?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Umesh Patil on Rajan Patil: विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
Amit Thackeray: पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
Eknath Shinde : देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
Embed widget