एक्स्प्लोर
Advertisement
साडे तीन हजार ग्रामपंचायतींसाठी 81 टक्के मतदान
राज्यात दोन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक झाल्यानंतर आज 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. सर्व ठिकाणी उद्या (मंगळवार) मतमोजणी होईल.
मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 81 टक्के मतदान झालं. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होतं. मात्र काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याचबरोबर इतर विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.
किरकोळ अपवाद वगळता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांतता आणि सुरळीतपणे पार पडली. सर्व ठिकाणी उद्या (मंगळवार) मतमोजणी होईल.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
- ठाणे- 33
- पालघर- 50
- रायगड- 162
- रत्नागिरी- 154
- सिंधुदुर्ग- 293
- पुणे- 168
- सोलापूर- 181
- सातारा- 256
- सांगाली- 425
- कोल्हापूर- 435
- उस्मानाबाद- 158
- अमरावती- 250
- नागपूर- 237
- वर्धा- 86
- चंद्रपूर- 52
- भंडारा- 361
- गोंदिया- 341
- गडचिरोली- 24
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
नाशिक
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion