एक्स्प्लोर

शंभर टक्के लॉकडाऊन असलेल्या औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये 29 कैद्यांना कोरोनाची बाधा

औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये सध्या 1500 कैदी आहेत. जेलमध्ये प्रवेश देताना आवश्यक ती काळजी घेतली जाते. तरी देखील आतमध्ये असणाऱ्या कैद्यांना कोरोना कसा झाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : शंभर टक्के लॉकडाऊन असलेल्या हर्सूल जेलमध्ये आज 29 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आला आहे . गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेले सहा जेल शंभर टक्के लॉकडाऊन केली होती .त्यामध्ये औरंगाबादच्या हर्सूल जेलचा देखील समावेश होता.

हर्सूल जेलमधील कर्मचारी आत आतमध्येच राहतील अशी व्यवस्था देखील करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. मग आतमध्ये असणाऱ्या कैद्यांना कोरोना कसा झाला हा प्रश्न निर्माण झाला आहे. जेल प्रशासनानं हलगर्जीपणा केला की, अन्य काही याची उत्तरं आता जेल प्रशासनाला द्यावं लागणार आहे. औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये सध्या 1500 कैदी आहेत. जेलमध्ये प्रवेश देताना सॅनिटायझर तसेच जेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखले जाते असे अनेक व्हिडिओ जेल प्रशासनानं माध्यमांना दिले होते.

कैद्यांची संख्या कमी व्हावी यासाठी सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या काही कैद्यांना सोडण्यात आलं होत. नवीन भरती होणाऱ्या कैद्यांसाठी शहरातील एका शाळेमध्ये तात्पुरतं जेल तयार करण्यात आलं होतं. त्यांना तिथे पंधरा दिवस ठेऊन नंतर जेलमध्ये प्रवेश दिला जात होता. मग कोरोना लॉकडाऊन असलेल्या जेलमध्ये पोहोचला कसा हा प्रश्न निर्माण होत आहे. या विषयी जेल प्रशासनाची बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. "मी बाहेर आहे माहिती घेऊन सांगतो", असं हर्सूलचे मुख्य अधिकारी जाधव यांनी सांगितले. त्यामुळे या घटनेची चौकशी होण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील आज कोरोनाची  स्थिती 
जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाबाधित 90 रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1हजार 936 झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत 96 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
#CORONA खासगी रुग्णालयांचे 80% बेड्स कागदावरच,रुग्णांना खाटा मिळत नाही हे वास्तव-देवेंद्र फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget