एक्स्प्लोर

सांगलीतील 'त्या' चार कोरोना बाधितांच्या संपर्कात 29 जण, जवळचे 7 नातेवाईक आयसोलेशनमध्ये दाखल

प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे. मात्र या सर्वांच्यावर आरोग्य यंत्रणा ही नजर ठेवून आहे.

सांगली : सांगलीमध्ये सापडलेल्या चार कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात तब्बल 29 जण संपर्कात आल्याची माहिती आता पर्यंत प्राप्त झाली आहे. तसेच यापैकी कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळच्या सात नातेवाईकांना ताब्यात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने उपचासाठी दाखल केले. मात्र अद्याप पर्यंत कोरोनाची कोणतीही लक्षण यापैकी कोणालाही आढळून आले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले आहे.

सौदी अरेबियातून सांगलीच्या इस्लामपूर मध्ये परतलेल्या चार प्रवाशांना कोरानाची लागण झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा प्रशासनाकडून तातडीने शोध सुरू करण्यात आला होता आणि यामध्ये या रुग्णांच्या संपर्कात तब्बल 29 जण आत्तापर्यंत आल्याचं समोर आले आहे. तर त्यापैकी कोरोनाबाधीत रुग्णांच्या जवळच्या सात नातेवाईकांना जिल्हा आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आयसोलेशन वार्डत दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे. मात्र या सर्वांच्यावर आरोग्य यंत्रणा ही नजर ठेवून आहे. त्याचबरोबर जे चार कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यांचा इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांशी संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्व ती खबरदारी आणि उपाययोजना करण्यात येत आहेत,अशी माहितीही डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

भारतात जीवघेणा कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढतच आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 499 वर पोहोचला आहे. आतापर्यंत या व्हायरसने 10 लोकांचा जीव घेतला आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून सर्वाधिक 107 कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. तर तीन जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त केरळमध्ये असून एकूण 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर केरळमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या व्हायरसला रोखण्यासाठी देशभरातील 30 राज्य लॉकडाऊन करण्यात आली आहेत. पंजाब, महाराष्ट्र आणि चंडीगढमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

coronavirus | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण

भिवंडीत होम कोरेन्टाईन संशयितांची नागरीकांना भीती, कारवाई करण्यात प्रशासन अपयशी

बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी, दिवसाआड औषध फवारणी; कोल्हापुरातील माणगावाचा स्तुत्य उपक्रम

#Corona Death | महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget