एक्स्प्लोर

मुलांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद, 12 ते 15 वयोगटातील मुलांनाही लस देण्याची केंद्राकडे मागणी : राजेश टोपे

मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

जालना : आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जालन्यामधील आरोग्य केंद्रामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. तसेच 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लस देण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्याकडे केली असल्याचेही टोपे म्हणाले. दरम्यान, सध्या राज्यात लॉकडाऊनचा विचार नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

15 ते 18 वयोगटातील लसीकरणामुळे कोरोनोला थांबवण्यासाठी चांगला उपयोग होईल असे ते म्हणाले. या गटातील मुले खूप फिरणारी असतात. त्यामुळे त्यांना लसीकरणाची खूप गरज होती. त्यादृष्टीने लसीकरण सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले. वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बैठक झाली. याबाबत कमी दरात औषधे उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या किट्स उपलब्ध करुन देण्याची मागणीही केल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण करावे, अशी विनंती यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केल्याचे टोपे यांनी सांगितले.

सर्व राज्यांना सारखे नियम लागू करावेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. मात्र, सर्व राज्यांना समान नियम लागू करावेत अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. लहान मुलांना शाळेत जाऊनच लसीकरण करावे, अशी आमची योजना होती, मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकाणातून आम्ही लसीकरण केंद्रावरचे लस देण्याचे नियोजन केल्याचे टोपे म्हणाले. 
15 ते 18 वयोगटातील राज्यात जवळपास 70 ते 80 लाख मुले आहेत. त्या सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे टोपे म्हणाले. सुरक्षीततेचा विचार करुन लसीकरणाच्या बाबतीत आवश्यक ते बदल केले जातील असे टोपेंनी यावेळी सांगितले. 

नेत्यांनी आयोजकांना सांगावे
अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत, असा प्रश्न टोपे यांना केले असता, त्यांनी सांगितले की, सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. आयोजकांनी नियमांचे पालन करुन कार्यक्रम घ्यावेत. तसेच राजकीय नेत्यांनीसुद्धा त्यांना तसे सांगावे असे टोपे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget