मुलांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद, 12 ते 15 वयोगटातील मुलांनाही लस देण्याची केंद्राकडे मागणी : राजेश टोपे
मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

जालना : आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जालन्यामधील आरोग्य केंद्रामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. तसेच 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लस देण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्याकडे केली असल्याचेही टोपे म्हणाले. दरम्यान, सध्या राज्यात लॉकडाऊनचा विचार नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
15 ते 18 वयोगटातील लसीकरणामुळे कोरोनोला थांबवण्यासाठी चांगला उपयोग होईल असे ते म्हणाले. या गटातील मुले खूप फिरणारी असतात. त्यामुळे त्यांना लसीकरणाची खूप गरज होती. त्यादृष्टीने लसीकरण सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले. वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बैठक झाली. याबाबत कमी दरात औषधे उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या किट्स उपलब्ध करुन देण्याची मागणीही केल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण करावे, अशी विनंती यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केल्याचे टोपे यांनी सांगितले.
सर्व राज्यांना सारखे नियम लागू करावेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. मात्र, सर्व राज्यांना समान नियम लागू करावेत अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. लहान मुलांना शाळेत जाऊनच लसीकरण करावे, अशी आमची योजना होती, मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकाणातून आम्ही लसीकरण केंद्रावरचे लस देण्याचे नियोजन केल्याचे टोपे म्हणाले.
15 ते 18 वयोगटातील राज्यात जवळपास 70 ते 80 लाख मुले आहेत. त्या सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे टोपे म्हणाले. सुरक्षीततेचा विचार करुन लसीकरणाच्या बाबतीत आवश्यक ते बदल केले जातील असे टोपेंनी यावेळी सांगितले.
नेत्यांनी आयोजकांना सांगावे
अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत, असा प्रश्न टोपे यांना केले असता, त्यांनी सांगितले की, सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. आयोजकांनी नियमांचे पालन करुन कार्यक्रम घ्यावेत. तसेच राजकीय नेत्यांनीसुद्धा त्यांना तसे सांगावे असे टोपे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? एकाच आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ
- Coronavirus : दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगालनंतर मुंबईसह महाराष्ट्रातही कठोर निर्बंध? ABP Majha
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या






















