एक्स्प्लोर

आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष, तर राज्यपाल राष्ट्रपतींच्या भेटीला

राज्यपालांनी घेतलेला सरकार स्थापनेचा निर्णय हा बेकायदेशीर आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांनी मांडली आहे. तसेच विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावं, असेही या पक्षांचे म्हणणे आहे. तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे मागणी केली आहे की, उद्याच विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात यावे.

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून आज महिना पूर्ण झाला आहे. पण तरीही सत्तास्थापनेतला पेच कायम असल्याचं दिसत आहे. आता महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सुप्रीम कोर्टाच्या दारी पोहचला आहे. हे होत असताना राज्यपालांनी दिल्लीत राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. अजित पवारांना सोबत घेऊन केलेल्या भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी होणार आहे. 24 तासाच्या आत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहेत. तर राज्य सरकारच्या वतीनं अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल हे बाजू मांडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. सुप्रीम कोर्टातल्या महत्वाच्या घडामोडी आधी दोघांची भेट महत्वाची ठरणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कोणालाही कल्पना नसताना काल सकाळी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे गुपचूप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतरही राज्यातील सत्तासंघर्षाचा ड्रामा संपलेला नाही. कारण भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी घेतलेला सरकार स्थापनेचा निर्णय हा बेकायदेशीर आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांनी मांडली आहे. तसेच विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावं, असेही या पक्षांचे म्हणणे आहे. तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे मागणी केली आहे की, उद्याच विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात यावे. त्यानंतर बहुमताची जी प्रक्रिया यावेळी पार पडेल, त्याचे चित्रीकरण केले जावे, जेणेकरण कोर्टासमोर सर्व पुरावे उपलब्ध होतील. आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवलं फोडाफोडीच्या भीतीनं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईतल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. काल वाय बी चव्हाण सेंटरमधली बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बसमधून रेनेसान्स हॉटेलमध्ये नेण्यात आलं. या आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यावर देण्यात आली आहे. शिवसेना आमदारांचा हॉटेल ललितमधला मुक्कामही वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदारही मुंबईबाहेर जाणार नाहीत. त्यांनाही अंधेरीच्या जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याच्या शक्यतेनं काँग्रेस आमदारांना मुंबईतच ठेवलं गेलंय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Agniveer Scheme: अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास ना निवृत्तीवेतन ना मरणोत्तर लाभ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास ना निवृत्तीवेतन ना मरणोत्तर लाभ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
Mumbai Crime News: वडिलांना व्हिडीओ कॉल करून मुलीनं संपवलं जीवन; गळ्याला दोर अन्... तिच्या मृत्यूनंतर बापानं टाळ्या वाजवल्या, पत्नीला संपवण्याची धमकी, कारणही समोर
वडिलांना व्हिडीओ कॉल करून मुलीनं संपवलं जीवन; गळ्याला दोर अन्... तिच्या मृत्यूनंतर बापानं टाळ्या वाजवल्या, पत्नीला संपवण्याची धमकी, कारणही समोर
IND vs AFG Test Squad : शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वि्स्ट; सी.व्ही.षण्मुगम यांचा मोठा निर्णय, अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट
विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वि्स्ट; सी.व्ही.षण्मुगम यांचा मोठा निर्णय, अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट

व्हिडीओ

Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
Embed widget